शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

योजना यशस्वीपणे राबवाव्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:06 IST

: गावाची स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आदी दैनंदिन कामे गावाने पर्यायाने ग्रामपंचायतीने करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना उपसभापती रवींद्र भोये यांनी केले.

त्र्यंबकेश्वर : गावाची स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आदी दैनंदिन कामे गावाने पर्यायाने ग्रामपंचायतीने करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना उपसभापती रवींद्र भोये यांनी केले. ग्रामपंचायतींचा सर्वंकष विकास व्हावा, संपूर्ण वसुली करून ग्रामपंचायत हद्दीतील हवी ती विकासकामे करण्यासाठी तालुक्यात सरपंच परिषदेची स्थापना करण्यात आली. सरपंच परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून विद्यमान भोये यांची एकमताने निवड झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पं. स. अध्यक्ष ज्योती राऊत, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सहायक गटविकास अधिकारी समीर वाठारकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दगडू राठोड, उपअभियंता विजय साळुंखे, समाज कल्याण विस्तार अधिकारी भामरे उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, जलसंधारणाची कामे पर्यावरण, कुपोषण, पीक पद्धती, वनीकरण, वृक्षतोड, साक्षरता, रोजगार, शिक्षण, दारूबंदी, प्रदूषण, अंधश्रद्धा, बालमृत्यू रोखणे आदी कामांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तालुक्यातील गावांचा विकास साधण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील प्रशासनाकडून कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी मोठ्या लोकसंख्येच्या एकूण १८ ग्रामपंचायतींची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात येऊन एक वर्षासाठी सरपंच परिषदेची स्थापना करण्यात आली. यावेळी सरपंचांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. वरील विकासकामांसह कुपोषण, पीक पद्धती, वृक्षतोड, वनीकरण, साक्षरता, शिक्षण, रोजगार, ग्राम सुरक्षा, दारूबंदी, प्रदूषण, सौरऊर्जा, बाजार व्यवस्था, गटशेती, शेतकरी विकास, अंधश्रद्धा आदी कामांसह गावांचा विकास साधण्यासाठी हिवरे बाजार राळेगणसिद्धी पाटोदा (जि. औरंगाबाद) तसेच बागलाण तालुक्यातील किकवारीच्या आदर्श ग्रामपंचायतीच्या धर्तीवर आपल्या ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन कार्यरत असावे, असेही आवाहन भोये यांनी केले. वाघेरा येथील सरपंच जयराम मोंढे यांनी सरपंचांना कामे करताना येणाºया समस्या, ग्रामसेवकांचे असहकार्य, दप्तर दिरंगाई वगैरे अडचणी विशद केल्या.