शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दुर्मीळ उदमांजराला पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:12 IST

येवला : शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकासमोर एका शेतात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात प्राणिमित्रास यश आले असून, या उदमांजरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

येवला : शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकासमोर एका शेतात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात प्राणिमित्रास यश आले असून, या उदमांजरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.रेल्वे स्थानकासमोरील योगेश शिंदे यांच्या शेतात सोमवारी (दि.२५) सायंकाळी एक दुर्मीळ उदमांजर अन्न पाण्याच्या शोधात आले. ह्यावेळी शिंदे यांचे कुटुंबीय शेतात काम करीत असताना त्यांना ते दिसले. रानमांजर आहे असे समजून सर्वांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मांजर शेतातील सीमेंटच्या पाइपमध्ये शिरले. ते बाहेर येत नसल्याने शिंदे कुटुंबीयांनी शहरातील प्राणिमित्र संजय लाहुरे यास फोन करून बोलाविले. लाहुरे यांनी पाइपजवळ जाऊन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु बराच वेळ होऊनही त्या उदमांजरास पकडण्यात यश मिळत नव्हते. अखेरीस प्राणिमित्र लाहुरे यांनी त्यांच्याजवळ असलेला पिंजरा आणून त्या ठिकाणी लावला आणि रात्री उशिरापर्यंत त्याला पकडण्यात आले. यावेळी सोमनाथ गुंड, जगदीश भालेरे, कृष्णा गाडेकर, निखिल परदेशी, योगेश लुळेकर, आकाश परदेशी, योगेश शिंदे आदींचे सहकार्य लाभले. या घटनेची वनविभागास माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागाचे दामोदर अहिरे, पंकज नागपुरे व के.के. गायकवाड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उदमांजरास ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षितस्थळी सोडून दिले.---------------------उदमांजर हा प्राणी प्रामुख्याने रात्री वावरतो. जंगलात बीळ करून राहणारा हा प्राणी सस्तन व मांसाहारी प्राणी असून, उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, कीटक हे त्याचे खाद्य आहे. बदलत्या हवामानामुळे हे उदमांजर शहराकडे आले असावे.- संजय लाहुरे, प्राणिमित्र, येवला

टॅग्स :Nashikनाशिक