शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पाणी चोरांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: June 30, 2016 00:53 IST

मिलिंद शंभरकर : नांदगावी पाणीप्रश्नी बैठक; नगरसेवक आक्रमक

नांदगाव : पाणी गळती रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत तसेच पाणी नियोजनाचे सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे आदेश देत कोणी पाणी चोरी करत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.नांदगाव शहराच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या दालनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, नगराध्यक्ष शैला गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी प्रकाश नंदनवरे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी. दातीर, उपकार्यकारी अधिकारी प्रकाश बोरसे, अभियंता व्ही.एन. पाटील, नांदगावचे पाणीपुरवठा अधिकारी विश्वास अहिरे व नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.नांदगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गिरणा धरणातून पाणी उपसा करणारे व्ही.टी.पंप नादुरुस्त झालेले असून, सध्या फक्त एका पंपाव्दारेच पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.गिरणा धरणात पाणी उपसा करण्यासाठी नवीन व्ही.टी.पंप व १८० हॉर्स पॉवरच्या मोटारीसाठी सुमारे २८ लक्ष इतका खर्च अपेक्षित असून, यापैकी सुमारे १० लक्ष इतकी रक्कम देण्यास नांदगाव नगरपालिका तयार असल्याचे नगराध्यक्ष शैला गायकवाड यांनी सांगितले. तसेच नांदगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेत सुधारणा होण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून गुरुकृपानगर येथील नवीन पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीदेखील नगराध्यक्ष शैला गायकवाड यांनी यावेळी केली. प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून नांदगाव शहरास किमान पाच दिवसांनी पाणीपुरवठा करावा तसेच आगामी रमजान ईद सणासाठी जास्तीचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी यावेळी बोलताना केली.यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी प्रकाश नंदनवरे, नगराध्यक्ष शैला गायकवाड, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, साहेबराव पाटील, शहराध्यक्ष अरुण पाटील, नगरसेवक बाळकाका कलंत्री, इकबाल शेख, शिवाजी पाटील, नगरसेविका इंदिरा बनकर, सीमा राजुळे, इंदूबाई जाधव, मंगला काकळीज, विश्वास अहिरे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी. दातीर, उपकार्यकारी अधिकारी प्रकाश बोरसे, अभियंता व्ही.एन. पाटील, विनोद शेलार, सुरेश गायकवाड, अशोक गायकवाड, महेंद्र गायकवाड, सचिन देवकाते, राजू लाठे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)