शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भुयारी मार्गामध्ये साचले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:31 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे.

इंदिरानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक भुयारी मार्गामध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे भुयारीमार्ग शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, याकरिता संबंधित अधिकऱ्यांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.मुंबई-आग्रा महामार्गापासून आजूबाजूस राहणारे स्थानिक लोक तसेच काही कामानिमित्ताने महामार्गावरून रस्त्याच्या एका बाजूने दुसºया बाजूस ये-जा करणारे पादचारी यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता तसेच या भागात मोठे अपघात होऊन काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून अपघात टाळण्याकरिता तसेच पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा याकरता कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी भुयारी मार्ग तयार केले, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याकरिता संबंधित अधिकाºयांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा नागरिकांना वापर करता येत नाही त्यामुळे नागरिक उड्डाणपुलावरूनच मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने भुयारी मार्गातील पावसाचे पाणी काढून त्या ठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साचणार नाही याची उपाययोजना करण्याची मागणी नीलेश साळुंखे, महेश चव्हाण, विशाल मराठे, अजय पाटील, प्रवीण पवार, कुणाल पाटील, संदीप साळुंखे, राहुल काळे यांनी केला आहे.उड्डाणपुलावरून पादचाºयांचे मार्गक्रमणअल्को मार्ग परिसरातील आणि सिडको परिसरातील नागरिकांची उड्डाणपूल झाल्यापासून गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून मार्गक्र मण करीत होते. त्यामुळे लहान-मोठ्या अपघाताची संख्या वाढली होती. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक असा भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु पहिल्याच पावसात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. तसेच या पाण्यात शेवाळ मोठ्या प्रमाणात साचले आहे.भुयारी मार्गात टवाळखोरांचा वावरअपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणावर राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. भुयारी मार्गाबाबत करण्यात आलेले नियोजन हे एकप्रकारे चुकीचे दिसून येत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग पादचाºयांसाठी निरु पयोगी ठरत आहे. या भुयारी मार्गात सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून येत नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग टवाळखोरांचा अड्डा होऊ पाहत आहे. या ठिकाणी आपल्याला जागोजागी मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पादचाºयांना कितपत उपयोग होणार आहे, याबाबत कधी दाखल घेतली गेलेली दिसून येत नाही.

टॅग्स :WaterपाणीTrafficवाहतूक कोंडी