शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गामध्ये साचले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:31 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे.

इंदिरानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक भुयारी मार्गामध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे भुयारीमार्ग शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे.या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, याकरिता संबंधित अधिकऱ्यांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.मुंबई-आग्रा महामार्गापासून आजूबाजूस राहणारे स्थानिक लोक तसेच काही कामानिमित्ताने महामार्गावरून रस्त्याच्या एका बाजूने दुसºया बाजूस ये-जा करणारे पादचारी यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता तसेच या भागात मोठे अपघात होऊन काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून अपघात टाळण्याकरिता तसेच पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा याकरता कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी भुयारी मार्ग तयार केले, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याकरिता संबंधित अधिकाºयांकडून या कामाची दखल घेऊन ताबडतोब योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा नागरिकांना वापर करता येत नाही त्यामुळे नागरिक उड्डाणपुलावरूनच मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने भुयारी मार्गातील पावसाचे पाणी काढून त्या ठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साचणार नाही याची उपाययोजना करण्याची मागणी नीलेश साळुंखे, महेश चव्हाण, विशाल मराठे, अजय पाटील, प्रवीण पवार, कुणाल पाटील, संदीप साळुंखे, राहुल काळे यांनी केला आहे.उड्डाणपुलावरून पादचाºयांचे मार्गक्रमणअल्को मार्ग परिसरातील आणि सिडको परिसरातील नागरिकांची उड्डाणपूल झाल्यापासून गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून मार्गक्र मण करीत होते. त्यामुळे लहान-मोठ्या अपघाताची संख्या वाढली होती. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अल्को मार्केट ते स्टेट बँक चौक असा भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु पहिल्याच पावसात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. तसेच या पाण्यात शेवाळ मोठ्या प्रमाणात साचले आहे.भुयारी मार्गात टवाळखोरांचा वावरअपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणावर राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. भुयारी मार्गाबाबत करण्यात आलेले नियोजन हे एकप्रकारे चुकीचे दिसून येत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग पादचाºयांसाठी निरु पयोगी ठरत आहे. या भुयारी मार्गात सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसून येत नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग टवाळखोरांचा अड्डा होऊ पाहत आहे. या ठिकाणी आपल्याला जागोजागी मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीत काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पादचाºयांना कितपत उपयोग होणार आहे, याबाबत कधी दाखल घेतली गेलेली दिसून येत नाही.

टॅग्स :WaterपाणीTrafficवाहतूक कोंडी