शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील सुभाष देसाई : औद्योगिक संघटना पदाधिकाºयांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:28 IST

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारणीराज्यात दोन हजार प्लॉट घेतले

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी बोलताना दिली.नाशिक दौºयावर आलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करताना नाशिकच्या विकासासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करीत आहे. त्यात प्रामुख्याने ओझरजवळ नाशिकपासून २२ किलोमीटरवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारणीच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी एसपीव्हीदेखील तयार झालेला असल्याचे सांगितले. आयटी पार्कची जागा इतर उद्योगांना देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. इमारतीच्या जागेचे दर कमी करण्यात येणार आहेत. राज्यात उद्योग उभारणीच्या उद्देशाने दिलेल्या जागेचा गैरवापर केला जात होता. तसे प्लॉट परत घेण्यात आले आहेत. राज्यात असे दोन हजार प्लॉट घेतले असून, नाशिक विभागातून ३० प्लॉट परत घेतलेले आहेत. ते पुढील प्रक्रियेतून वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन वानखेडे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. डी. रेंदाळकर, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, नाईसचे चेअरमन विक्रम सारडा, क्रेडाई अध्यक्ष सुनील कोतवाल, नेमिचंद पोद्दार, इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन नरेंद्र गोलिया, अतुल चांडक, हेमंत राठी, संजीव नारंग, नाशिक सिटीझन फोरमचे डॉ. नारायण विंचूरकर, हेमंत बक्षी, मधुकर ब्राह्मणकर, उदय खरोटे, खुशाल पोद्दार, उदय घुगे, आशिष नहार आदी उपस्थित होते. नाशिकच्या उद्योजकांच्या पुढाकाराने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमात आलेल्या १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला तातडीने दिंडोरी परिसरात जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत दिंडोरी परिसरातील पायाभूत सुविधा पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यापाठोपाठ लगेचच नवीन प्रकल्पांचा विचार केला जाणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.