शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सुभाष भामरे : महिला सक्षमीकरणामध्ये अग्रवाल समाजाचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 18:10 IST

अग्र नारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या १५व्या राज्यस्तरीय ‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन रविवारी (दि.१८) शहरातील स्वामी नारायण बॅक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडले.

ठळक मुद्दे‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन अग्रवाल समाज हा महाराजा श्री अग्रसेन महाराज यांच्या तत्त्वांवर चालणाराअग्रज्योती, अग्रप्रभा पुरस्काराने समाजातील महिला सन्मानित

नाशिक : महिलांचे आर्थिक सामाजिक सबलीकरण व सक्षमीकरण करणे हे सरकारचे मिशन कार्यक्रमांपैकी जरी एक असले तरी उत्तर महाराष्टÑातील नव्हे तर देशभरातील अग्रवाल समाजाचे महिला सक्षमीकरणासाठी मिळणारे योगदान हे नक्कीच प्रेरणादायी आहे. हा समाज शिक्षण, राजकारण, समाजकारण, महिलांचा सर्वांगिण विकास अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून चोख भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.अग्र नारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या १५व्या राज्यस्तरीय ‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन रविवारी (दि.१८) शहरातील स्वामी नारायण बॅक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी भामरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, राज्य अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी, प्रांतीय महामंत्री उषा अग्रवाल, प्रांतीय उपाध्यक्ष शारदा अग्रवाल, चेअरपर्सन मीना अग्रवाल, विभागीय अध्यक्ष अलका अग्रवाल, अग्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष किरण अग्रवाल, अग्रवाल सभेचे अध्यक्ष नेमिचंद पोद्दार, जिल्हाध्यक्ष सपना अग्रवाल,अध्यक्ष अलका अग्रवाल, वीणा गर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी भामरे म्हणाले, अग्रवाल समाज हा महाराजा श्री अग्रसेन महाराज यांच्या तत्त्वांवर चालणारा समाज आहे. त्यांनी दिलेला मुलमंत्र आर्थिक समानता, आपापसांत सहकार्य अन् संघटनाचे महत्त्व समाजाने गांभीर्याने ओळखले आहे. त्यामुळे हा समाज आज राजकारणात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावताना दिसतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या समाजाने दिलेले योगदान प्रशंसनीय आहे. या समाजाने महिलांच्या सक्षमीकरणाची गरज वेळीच ओळखून त्यांना लघुउद्योग, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविले. महिलांचे संघटन अन सक्षमीकरण कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण अग्रवाल समाजाने पुढे ठेवल्याचे भामरे यांनी यावेळी अधोरेखित केले.अग्र नारी असोसिएशनने केलेले महिलांचे संघटन आणि सर्वांगिण विकास कौतुकास्पद असल्याचे भानसी यांनी यावेळी मनोगतातून सांगितले. तसेच हिरे यांनीही अग्रवाल महिला संघटनेच्या कार्याचे कौतुक करत अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पाच ठराव हे ज्वलंत विषयांना अनुसरून असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते अग्रज्योती, अग्रप्रभा पुरस्काराने समाजातील महिलांना सन्मानित करण्यात आले. तसेच अग्र प्रेरणा-२०१८’ या माहितीपुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक महामंत्री उषा अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन रुपा अग्रवाल, दीपक अग्रवाल यांनी केले.

यांचा झाला सन्मानअग्रज्योती पुरस्कारार्थी : अलका अग्रवाल (शैक्षणिक), वीणा गर्ग (औद्योगिक), निर्मला अग्रवाल (सांस्कृतिक), अनिता अग्रवाल (सामाजिक), ममता गिंदोडीया (अध्यात्म)अग्रप्रभा पुरस्कारार्थी : कल्पना चौधरी (महिला संघटन), मंजु तुलस्यान (सामाजिक), शीला अग्रवाल (महिला उत्थान), शोभा पालडीवाल (धार्मिक)विशेष पुरस्कार : सपना अग्रवाल, अरुणा अग्रवाल, डॉ. ममता अग्रवाल.असे झाले ठरावगरजूंसाठी अवयवदान करत आपल्या मृत्यूनंतर आपण एखाद्याला जीवदान देऊ शकतो. तसेच मरावे परि अवयवरुपी उरावे या उक्तीनुसार आपण अवयवदात्यांची संख्या वाढविण्यामध्ये हातभार लावूया असे डॉ. ममता अग्रवाल यांनी अवयवदानाचा ठराव सुचविला. तसेच पर्यावरणाचे संतुलन टिकविणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने पर्यावरण संरक्षणाचा ठराव नीरा अग्रवाल यांनी मांडला तर प्रि वेडिंग फोटो शूटवर बंदी गरजेची हा ठराव संगीता चौधरी यांनी पुढे आणला. याबरोबरच गोपनीय व्यवहारामध्ये स्त्री-पुरूष दोघांमध्ये समन्वय गरजेचा असल्याचा ठराव मीना अग्रवाल व मुलीच्या वैवाहिक आयुष्यात आईची भूमिका व संस्काराचे महत्त्वाचा ठराव ममता गिंदोडिया यांनी मांडला. अधिवेशनात मांडण्यात आलेले हे ठराव सर्वांनुमते पारित करण्यात आले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWomenमहिला