शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

पुणेगाव कालव्याच्या अपूर्ण कामासाठी उपविभागाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:53 IST

चांदवड : पुणेगाव कालव्याच्या अपूर्ण कामांसाठी पुणेगाव कालवा उपविभागाचे कार्यालय धुळे येथून परत नाशिक येथे स्थलांतर झाले आहे. चांदवड जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्यानिर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील कडवा कालवा विभाग नाशिक हे विभागीय कार्यालय व त्याअंतर्गत असलेल्या चार उपविभागीय कार्यालयांसह दि. १६ जुलै रोजी धुळे येथे सुलवाडे, जामफळ, कनोली उपसिंचन योजनेसाठी स्थंलातरित झाले होते.

चांदवड : पुणेगाव कालव्याच्या अपूर्ण कामांसाठी पुणेगाव कालवा उपविभागाचे कार्यालय धुळे येथून परत नाशिक येथे स्थलांतर झाले आहे. चांदवड जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्यानिर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील कडवा कालवा विभाग नाशिक हे विभागीय कार्यालय व त्याअंतर्गत असलेल्या चार उपविभागीय कार्यालयांसह दि. १६ जुलै रोजी धुळे येथे सुलवाडे, जामफळ, कनोली उपसिंचन योजनेसाठी स्थंलातरित झाले होते. नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत पुणेगाव, ओझरखेड, दरसवाडी आदी योजनांचा समावेश होता. सदर योजनांची कामे प्रशासकीय मान्यतेअभावी मागील पाच वर्षांपासून बंद होती. माहे नोव्हेंबर २०१७ मध्ये या प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रकल्प अहवालास (किंमत रु . ९१७ कोटी) शासनाची मान्यता मिळालेली आहे. सदर शासन मान्यतेनुसार ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाची कामे दोन वर्षांत पूर्ण करावयाची आहेत.परंतु या प्रकल्पाशी निगडित तांत्रिकदृष्ट्या व भौगोलिकदृष्ट्या माहिती असलेले अनुभवी अधिकारी व कर्मचारी असलेले कार्यालय नाशिक येथून हलविल्यामुळे सदर ३५ वर्षांपासून प्रलंबित व आज रोजी अंतिम टप्प्यात असलेली पुणेगाव, ओझरखेड व दरसवाडी आदी कामांवर परिणाम होऊन चांदवड तालुक्यातील सुमारे पाच हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार होती. तसेच सदर प्रकल्पासाठी दुष्काळग्रस्त भागातील गरीब शेतकऱ्यांकडून सुमारे १२० हेक्टर जमीन ही मागील दहा वर्षांपासून शासनाने ताब्यात घेतली आहे; परंतु जमिनीचा मोबदला मिळण्या संदर्भात कार्यवाही अद्याप अपूर्ण आहे. सदर मोबदला देण्याची कामे नवीन कार्यालयाकडे वर्ग झाल्याने भूसंपादन प्रक्रि येत अडथळे निर्माण झाले होते. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव अहेर यांनी जुलै २०१८ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापासून सदर कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करू नये यासाठी अथक प्रयत्न केले. आमदारांनी कार्यालय नाशिक येथे परत आणण्यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला, त्यास यश मिळाले आहे. दि.२७ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयामुळे पुणेगाव कालव्याच्या विस्तारीकरण व सिंचन निर्मितीच्या कामांसाठी पुणेगा कालवा उपविभाग हे उपविभागीय कार्यालय धुळे येथून परत नांदूरमधमेश्वर प्रकल्प विभाग नाशिक अंतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे चांदवड तालुक्यातील लाभक्षेत्रातील शिवरे, बोराळे, बहादुरी, वडनेरभैरव, पिंपळनारे, खडकजांब, खडकओझर, नारायणगाव, जोपूळ, भाटगाव, परसूल, रेडगाव आदी क्षेत्रातील गावांच्या शेतकºयांना जमिनीचा मोबदला व सिंचनाच्या कामांचा प्रश्न सुटल्यामुळे आनंद व्यक्त करण्ण्यात येत आहे. आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नांमुळे पुणेगाव कालव्याचे पाणी तीस वर्षांनंतर प्रथमत: ६३ किमी. परसूल गावापर्यंत पाणी आले. दि. ८ सप्टेंबर २०१६ रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते परसूल येथे जलपूजन करण्यात आले होते. आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नांमुळे लाभक्षेत्रात पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या, तसेच जलजागृती सप्ताह यासारखे अभिनव उपक्र म राबविण्यात येत आहेत. आमदार यांच्या प्रयत्नांमुळे पुणेगाव कालव्याच्या कामासाठी चालू वर्षी रु . ३५ कोटी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी