शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंजनेरी किल्ला परिसराचा विद्यार्थ्यांनी केला अभ्यास दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 17:52 IST

पिंपळगाव बसवंत : येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वरजवळील अंजेनेरी किल्ला परिसराची साफसफाई तसेच ऐतिहासिक माहिती घेत अभ्यास दौरा पूर्ण केला.

प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभ्यास दौ-यात इतिहास विभागप्रमुख प्रा.नारायण शिंदे, समन्वयक प्रा. डॉ. छाया भोज, प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी पदवी व पदवीत्युर वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंजनेरी गावाजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतीय नाणे संशोधन केंद्र १९८४ सालापासून उभारण्यात आलेले आहे. या केंद्रामध्ये दुर्मिळ नाणी, चित्रे, नकाशे, मूर्ती, ऐतिहासिक वस्तू आहेत. भारतातील नाणे संशोधनास उत्तेजन देणारी ही भारतातील पहिली व एकमेव अशी संस्था आहे. भारताचा वैभवशाली इतिहास व संस्कृती याविषयी लोकांमध्ये ज्ञान व जागरु कता वाढविणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. नाण्यांच्या माध्यमातून प्राचीन काळापासूनच इतिहास व त्या अनुषंगाने विविध राजवटींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. नाणे हे इतिहासाचे अस्सल, प्रथम दर्जाचे व अविनाशी असे साधन आहे. नाण्यांमुळे कालखंड, धातुकाम, राजांची नावे, देवदेवता, धार्मिक स्थिती आदी माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना माहिती देताना प्रा. शिंदे म्हणाले की, काळाच्या ओघात जमिनीवर व जमिनीखाली असंख्य नाणी आजही सुस्थितीत सापडतात. त्याबाबत संशोधन होणे अत्यंत महत्वाचे आहे. अंजनेरी हा महत्त्वाचा किल्ला आहे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला अशी आख्यायिका आहे. अंजेनेरी किल्ल्या मार्गावर गुहा आहे. त्यामध्ये जैन लेणे आहे. मुख्य दालनात पार्श्वनाथांची मुर्ती आहे. त्याच्या बाजूला दोन उभ्या मूर्ती व सन ११४१ असा उल्लेख असलेला संस्कृत शिलालेख आहे. बालेकिल्ल्यावर दोन खोल्यांची सीता गुंफा आहे. त्यामध्ये शिल्पे कोरलेली आहेत. अंजनेरी पठारावर काही दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. तसेच जैवविविधता आहे. वन्यपशु प्राणी आहेत. त्यांचे निरीक्षण करु न विद्यार्थ्यांनी नोंदी घेतल्या. त्यांच्या संरक्षण व संवर्धनाचा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी सोडला.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी