शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘सेतू’ला विद्यार्थी, पालकांचा वेढा :दाखल्यांसाठी वणवण

By admin | Updated: June 21, 2017 18:10 IST

महिन्यापूर्वी सर्व कागदपत्रे सादर करूनही दाखले मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थी, पालकांचा धीर सुटत चालला असून, दिवसेंदिवस सेतू केंद्राबाहेरचा विळखा घट्ट होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महिन्यापूर्वी सर्व कागदपत्रे सादर करूनही दाखले मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थी, पालकांचा धीर सुटत चालला असून, दिवसेंदिवस सेतू केंद्राबाहेरचा विळखा घट्ट होत आहे. ठराविक दिवसांच्या मुदतीतच शाळा, महाविद्यालयीन प्रवेशाचे अर्ज कागदपत्रांसह दाखल करण्याचे बंधनकारक असल्यामुळे त्याचा फायदा मध्यस्थ व दलालांनी उठविण्यास सुरुवात केल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत प्रशाासनाने सेतू केंद्र चालकाला दंडाची नोटीस बजावली आहे. शैक्षणिक कारणासाठी जात, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, उत्पन्न, नॉन क्रिमीलेअर या शासकीय दाखल्यांची गरज असून, त्यासाठी सेतू वा महा ई सेवा केंद्रात अर्ज करून त्याआधारे देण्याची सोय शासनाने केली आहे. अर्जदाराने अर्ज दाखल केल्यानंतर सात दिवसांत दाखला दिला जावा, असे शासनाचे आदेश असले तरी, प्रत्यक्षात महिना उलटून गेल्यावरही शेकडो नागरिकांना दाखले मिळत नसल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. महा ई सेवा केंद्रचालकांकडून दाखले सेतू केंद्राकडे पाठविले जातात व तेथून ते स्वाक्षरीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे दिले जातात. ही सारी प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने होत असली तरी, अनेक नागरिकांनी महा ई सेवा केंद्रात दाखल्यासाठी अर्ज करूनही ते सेतूत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत तर दाखले परिपूर्ण करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठवूनही त्यांच्याकडून स्वाक्षरी होऊन येत नसल्याचे सेतू केंद्रचालकांचे म्हणणे आहे. अशातच गेल्या महिन्यापासून ‘महाआॅनलाइन’ या शासनाच्या सॉफ्टवेअर तसेच सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे ही सारी प्रक्रियाच संथगतीने पुढे सरकू लागली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थी, पालकांवर होत असून, मुदतीत दाखले मिळत नसल्यामुळे त्यांची होणारी तगमग दलाल, मध्यस्थांच्या पथ्थ्यावर पडली आहे. त्यातूनच पैसे घेऊन दाखले दिले जात असल्याच्या त्याचबरोबर शासकीय शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतल्याच्या तक्रारी असून, वशिलेबाजीचे आरोपही होऊ लागले आहेत. सेतू केंद्रचालकांबाबत होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने केंद्रचालकाला ५० हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर तांत्रिक दोष दूर करण्यासाठी महाआॅनलाइनचे राज्य समन्वयक सुर्वे यांनाही पाचारण करून त्यांच्या कानी सदरची बाब घालण्यात आली आहे. दहावी व बारावीनंतर पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी ठराविक दिवसांची मुदत असून, मुदतीत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.