शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शाळेतील विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:55 IST

मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली.

ठळक मुद्देपक्ष्यांच्या दणापाण्याची सोय करून भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबविली.

मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली.मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी मानोरी गावच्या वेशीत तसेच झाडावर, अंगणात दररोज सकाळी नित्यनियमाने पक्ष्यांचा किलबीलाट मोठ्या प्रमाणात ऐकु येत होता. परंतु वातावरण अचानक झालेल्या बदलामुळे येवला तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसापासून उष्णतेचा पारा चाळीशी पार गेल्याने विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबीलाट कमी झाल्याचे दिसून येत आहे. मानोरीत काही दिवसांपूर्वी सार्वजनिक पाणवठे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी, डबके अशा विविध ठिकाणी चिमणी, कावळे, साळुंकी, करकोचे, आदी पक्षी पाणी पिताना दिसून येत होते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई अचानक उष्णता वाढल्याने या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अशातच येवला तालुक्यातील मानोरी बुद्र्ुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक अगरचंद शिंदे आणि शिक्षक राजू सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील जून महिन्यात नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या वृक्षांनाच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या बाटल्या कापून तसेच नरसाळे आदींना झाडांच्या मध्यभागी बांधून या भटकत्या चिमण्या, कावळे, साळुंक्या आदी पक्ष्यांच्या दणापाण्याची सोय करून भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबविली.यावेळी समृद्धी मुदगुल, साहिल भवर, ऋग्वेद शेळके, शुभम तिपायले, राहुल तिपायले, अनुष्का भवर, अमित शेळके, कोमल डुकरे, अस्विनी तिपायले, पायल पवार, साहिल खैरनार आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.