शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

विद्यार्थ्यांचा विरोध मात्र गृहपाल ‘डीबीटी’साठी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:58 IST

नाशिक : आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून डीबीटी योजनेचा विरोध होत असला तरी आदिवासी विभागाच्या गृहपाल कर्मचारी संघटनेने मात्र डीबीटीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या भोजनाचे मानधन थेट बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देथेट लाभार्थी विद्यार्थ्यांकडून या योजनेचे स्वागत

नाशिक : आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून डीबीटी योजनेचा विरोध होत असला तरी आदिवासी विभागाच्या गृहपाल कर्मचारी संघटनेने मात्र डीबीटीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या भोजनाचे मानधन थेट बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तर आणि ग्रामीण भागातील वसतिगृहांमध्येही डीबीटी योजना राबवावी, अशी मागणी गृहापालांकडून जोर धरू लागली आहे. डीबीटी योजनेला आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून सातत्याने विरोध होत आहे, परंतु या योजनेला होणारा विरोध ठेके दारांनी फूस लावल्यामुळे होत असून डीबीटीच्या थेट लाभार्थी विद्यार्थ्यांचा या योजनेला विरोध नसल्याचे गृहपाल संघटनेकडून सांगितले जात आहे.भोजन व्यवस्थेबाबत खरेदी प्रक्रियेचे काम स्थानिक पातळीवर नाही. त्यामुळे ज्या मालाचा पुरवठा वसतिगृहांना होतो. त्याचप्रमाणे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांच्या आहाराची व्यवस्था केली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नियमित भोजन मिळू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची तिखट-फिके अशी वेगवेगळी भोजनाची सवय असते. परंतु, वसतिगृहांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखेच भोजन मिळत असल्याने परिणामी विद्यार्थी आणि गृहपालांमध्ये संघर्षाच्या घटनाही घडल्याचे समोर आले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही डीबीटी योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गृहपाल आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेतर्फे जोर धरू लागली आहे. आज मितीला राज्यात ४९१ आदिवासी वसतिगृह कार्यान्वित आहेत. त्यापैकी जिल्हा व विभाग-स्तरावरील जवळपास १२० वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेचा लाभ मिळत असून, त्यांच्या आवडीचे व चवीच्या पदार्थांचा भोजनात समावेश करता येतो.शिवाय गृहपाल आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्षाचेही कारण उरत नाही. त्यामुळे ही योजना राज्यातील सर्व वसतिगृहांमध्ये सुरू करण्यासाठी गृहपाल संघटनेने आग्रही भूमिका घेतली आहे. दरम्यान, काही विद्यार्थी संघटना डीबीटी योजनेला विरोध करीत असल्या तरी थेट लाभार्थी विद्यार्थ्यांकडून या योजनेचे स्वागत होत असल्याचे गृहपाल संघटनेचे राज्य अध्यक्ष सुशील तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.