शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

विद्यार्थ्यांचा विरोध मात्र गृहपाल ‘डीबीटी’साठी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:58 IST

नाशिक : आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून डीबीटी योजनेचा विरोध होत असला तरी आदिवासी विभागाच्या गृहपाल कर्मचारी संघटनेने मात्र डीबीटीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या भोजनाचे मानधन थेट बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देथेट लाभार्थी विद्यार्थ्यांकडून या योजनेचे स्वागत

नाशिक : आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून डीबीटी योजनेचा विरोध होत असला तरी आदिवासी विभागाच्या गृहपाल कर्मचारी संघटनेने मात्र डीबीटीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या भोजनाचे मानधन थेट बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तर आणि ग्रामीण भागातील वसतिगृहांमध्येही डीबीटी योजना राबवावी, अशी मागणी गृहापालांकडून जोर धरू लागली आहे. डीबीटी योजनेला आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून सातत्याने विरोध होत आहे, परंतु या योजनेला होणारा विरोध ठेके दारांनी फूस लावल्यामुळे होत असून डीबीटीच्या थेट लाभार्थी विद्यार्थ्यांचा या योजनेला विरोध नसल्याचे गृहपाल संघटनेकडून सांगितले जात आहे.भोजन व्यवस्थेबाबत खरेदी प्रक्रियेचे काम स्थानिक पातळीवर नाही. त्यामुळे ज्या मालाचा पुरवठा वसतिगृहांना होतो. त्याचप्रमाणे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांच्या आहाराची व्यवस्था केली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नियमित भोजन मिळू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची तिखट-फिके अशी वेगवेगळी भोजनाची सवय असते. परंतु, वसतिगृहांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखेच भोजन मिळत असल्याने परिणामी विद्यार्थी आणि गृहपालांमध्ये संघर्षाच्या घटनाही घडल्याचे समोर आले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही डीबीटी योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गृहपाल आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेतर्फे जोर धरू लागली आहे. आज मितीला राज्यात ४९१ आदिवासी वसतिगृह कार्यान्वित आहेत. त्यापैकी जिल्हा व विभाग-स्तरावरील जवळपास १२० वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेचा लाभ मिळत असून, त्यांच्या आवडीचे व चवीच्या पदार्थांचा भोजनात समावेश करता येतो.शिवाय गृहपाल आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्षाचेही कारण उरत नाही. त्यामुळे ही योजना राज्यातील सर्व वसतिगृहांमध्ये सुरू करण्यासाठी गृहपाल संघटनेने आग्रही भूमिका घेतली आहे. दरम्यान, काही विद्यार्थी संघटना डीबीटी योजनेला विरोध करीत असल्या तरी थेट लाभार्थी विद्यार्थ्यांकडून या योजनेचे स्वागत होत असल्याचे गृहपाल संघटनेचे राज्य अध्यक्ष सुशील तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.