शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

‘पात्रता’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चिंता

By admin | Updated: October 26, 2015 23:18 IST

शासन उदासीन : सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत आतापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरीची संधी मिळाली नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे पात्र उमेदवारांना डावलून जे पात्र नाहीत अशा उमेदवारांना मात्र नोकरीची संधी दिली जात असल्याचा आरोपही होत आहे. मागील दोन वर्षांपासून डीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टीईटी पात्र परीक्षा घेतली जाते. अत्यंत काठीण्य पातळी असलेल्या या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागतो. डीटीएड व बीएड उमेदवारांसाठी दरवर्षी सदर परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली जाते. पेपर-१ व पेपर-२ मिळून ८०० रुपये परीक्षा शुल्कही आकारले जाते. सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सदर परीक्षा दिली असून, केवळ १७ हजार विद्यार्थी या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले आहेत. मागील दोन वर्षांचा निकाल ५ टक्के पेक्षाही कमी लागलेला असून मागील दोन वर्षांत उत्तीर्ण उमेदवारांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मागील दोन वर्षांतील विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीची संधी दिली नसताना शासन आता पुन्हा डिसेंबरमध्ये टीईटी परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. सिडकोतील विशाल पाटील या विद्यार्थ्याने टीईटी पात्रताधारकांसाठी संघटन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६६६.ेंँं३ी३ेङ्म५ेील्ल३@ ॅें्र’.ूङ्मे असे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण होऊनही जे विद्यार्थी अद्याप नोकरीपासून वंचित आहेत, असे विद्यार्थी आता एकत्रित लढा उभारणार आहेत. (प्रतिनिधी)