शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

‘पात्रता’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चिंता

By admin | Updated: October 26, 2015 23:18 IST

शासन उदासीन : सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत आतापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरीची संधी मिळाली नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे पात्र उमेदवारांना डावलून जे पात्र नाहीत अशा उमेदवारांना मात्र नोकरीची संधी दिली जात असल्याचा आरोपही होत आहे. मागील दोन वर्षांपासून डीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टीईटी पात्र परीक्षा घेतली जाते. अत्यंत काठीण्य पातळी असलेल्या या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागतो. डीटीएड व बीएड उमेदवारांसाठी दरवर्षी सदर परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली जाते. पेपर-१ व पेपर-२ मिळून ८०० रुपये परीक्षा शुल्कही आकारले जाते. सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सदर परीक्षा दिली असून, केवळ १७ हजार विद्यार्थी या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले आहेत. मागील दोन वर्षांचा निकाल ५ टक्के पेक्षाही कमी लागलेला असून मागील दोन वर्षांत उत्तीर्ण उमेदवारांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मागील दोन वर्षांतील विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीची संधी दिली नसताना शासन आता पुन्हा डिसेंबरमध्ये टीईटी परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. सिडकोतील विशाल पाटील या विद्यार्थ्याने टीईटी पात्रताधारकांसाठी संघटन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ६६६.ेंँं३ी३ेङ्म५ेील्ल३@ ॅें्र’.ूङ्मे असे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण होऊनही जे विद्यार्थी अद्याप नोकरीपासून वंचित आहेत, असे विद्यार्थी आता एकत्रित लढा उभारणार आहेत. (प्रतिनिधी)