शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी निकालात घेतली भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:18 IST

बारावीच्या निकालात गेल्या वर्षांच्या तुलनेत उत्तीर्णतेचा टक्का घसरल्याचे दिसून येत असताना नाशिक महाविद्यालायातील अनेक उच्च माध्यमिका विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दरवर्षी अशाप्रकारे शंभर टक्के निकाल मिळविणाऱ्या विद्यालयांध्ये विज्ञान शाखा असलेल्या संस्थांचाच वरचष्मा राहत होता,

नाशिक : बारावीच्या निकालात गेल्या वर्षांच्या तुलनेत उत्तीर्णतेचा टक्का घसरल्याचे दिसून येत असताना नाशिक महाविद्यालायातील अनेक उच्च माध्यमिका विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दरवर्षी अशाप्रकारे शंभर टक्के निकाल मिळविणाऱ्या विद्यालयांध्ये विज्ञान शाखा असलेल्या संस्थांचाच वरचष्मा राहत होता, परंतु यावर्षी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनीही बारावीच्या परीक्षेत चांगली क ामगिरी केली आहे. विशेष म्हणजे घटलेल्या निकालात विज्ञान शाखेची टक्का अधिक असून, त्या तुलनेत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिंनी अधिक उजळ कामगिरी केल्याचे दिसन येत आहे.नाशिकमधून गेल्या वर्षी कलाशाखेचा ७८.९३ टक्के, वाणिज्य शाखेचा ८९.५० व विज्ञान शाखेचा ९५.८५ टक्के निकाल लागला होता, त्या तुलने यावर्षी कला ७६.४५, वाणिज्य ८८.२८ व विज्ञान शाखेचा ९२.६० टक्के निकाल लागला आहे. यावर्षी सर्वच शाखांच्या निकालांमध्ये घसरण झाली आहे. यात कलाशाखेचा निकाल २.४८ टक्क्यांनी घसरला आहे, तर वाणिज्य शाखेचा १.२२ टक्के व विज्ञान शाखेच्या निकालात सर्वाधिक ३.२५ टक्के घसरण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विज्ञान शाखेच्या निकालात प्रगती होत असताना यावर्षी घसरलेला निकाल विचार करायला लावणारा आहे.ग्रामीण भागातून वाढला निकालबारावीच्या निकालात ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांनी निकालाचा टक्का वाढविल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने शासकीय आश्रमशाळांमधील बहुतांश शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शहरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बरोबरीने ग्रामीण भागातूनही शाळांचा शंभर टक्के निकाल लागल्याने आश्चर्य व्यक्त होत असले तरी दिंडोरीतील प्रकाशबापू कनिष्ठ महाविद्यालय, इगतपुरीतील वंडरलॅँड हायस्कूल, घोटीचे सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, अभोण्याचे जनता विद्यालय, चणकापूर, कनाशी, गणोरे, मोहदरी येथील शासकीय आश्रमशाळा, कळणचे टी. एन. रौंदळ विद्यालय, सखूबाई कनिष्ठ महाविद्याल, व्ही. टी. कनिष्ठ आदी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने कामगिरी केल्याचे बारावीच्या निकालातून दिसून आले.विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी द्यावा लागणाºया स्पर्धापरीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण झालेल्या तणावाचे प्रतिबिंब असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यासोबतच बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार वाणिज्य शाखेत उघडलेल्या करिअरच्या नवनवीन वाटा यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे वाढलेला कलही यातून दिसून येत आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालNashikनाशिक