शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

विद्यार्थ्यांनी केली पुरातन बारव स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:01 IST

सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : जुनी ऐतिहासिक वास्तू टिकविण्याची ग्रामस्थांची धडपड

सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.स्वामी षटकोपचार्य महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा संघाच्या माध्यमातून हिवाळी श्रम संस्कार शिबिरा निमित्ताने गावात साफसफाई करण्यासाठी ७ दिवस मुक्कामी आले आहेत. गावात मुख्य रस्ते आणि गल्ल्या कॉँक्रीेट केलेल्या असल्याने नेमके कोणते काम हाती घ्यावे असा विचार करत असतांना मुख्य समनव्यक प्रा. महेश बनकर गावात फेरफटका मारायला गेले असता गावालगत असलेली पुरातन बारव त्यांनी पाहिली गावकुसाला असलेली बारव हि गावासाठी अभिमानाची बाब आहे. शिवाय गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुढील पिढीला त्याची जाणीव व्हावी, विद्यार्थ्यांना सुद्दा बारव कशी आहे. आणि कोणत्या प्रकारचे बांधकाम आहे. याचा अभ्यास व्हावा म्हणून बारव स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. विद्यार्थ्यांच्या चमूने टिकाव, फावडे यांच्या साह्याने बारव स्वच्छ केली.अनेक वर्षे पाठपुरावा करून देखील गावाच्या या ऐतिहासिक वास्तूला मोकळा श्वास घेता येत नव्हता. प्रशासकीय अडचणी आणि परवानग्या यात अनेक वर्षे बारव स्वच्छ होत नव्हती. विद्यार्थ्यांनी मात्र काही तासात बारव स्वच्छ केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यासाठी राष्टÑीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. महेश बनकर, प्रा. एस. सी. आहिरे, सचिन शिंदे, दर्शन दराडे, प्रदीप पगारे, भाऊसाहेब आढाव, मयूर जाधव, अजय कारे यांनी प्रयत्न केले.अहल्यादेवी होळकर यांनी दुरदृष्टीने अनेक गावांत पाण्यासाठी बारव बांधले. ज्या गावात बारव आहे. त्या गावांना नक्कीच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कचरा, माती, दगड यांनी भरलेला बारव विद्यार्थ्यांनी स्वच्छ करून एक प्रकारे ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करीत ती टिकविण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.- डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्य सायखेडा महाविद्यालय.