शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विद्यार्थ्यांनी केली पुरातन बारव स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:01 IST

सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : जुनी ऐतिहासिक वास्तू टिकविण्याची ग्रामस्थांची धडपड

सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.स्वामी षटकोपचार्य महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा संघाच्या माध्यमातून हिवाळी श्रम संस्कार शिबिरा निमित्ताने गावात साफसफाई करण्यासाठी ७ दिवस मुक्कामी आले आहेत. गावात मुख्य रस्ते आणि गल्ल्या कॉँक्रीेट केलेल्या असल्याने नेमके कोणते काम हाती घ्यावे असा विचार करत असतांना मुख्य समनव्यक प्रा. महेश बनकर गावात फेरफटका मारायला गेले असता गावालगत असलेली पुरातन बारव त्यांनी पाहिली गावकुसाला असलेली बारव हि गावासाठी अभिमानाची बाब आहे. शिवाय गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुढील पिढीला त्याची जाणीव व्हावी, विद्यार्थ्यांना सुद्दा बारव कशी आहे. आणि कोणत्या प्रकारचे बांधकाम आहे. याचा अभ्यास व्हावा म्हणून बारव स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. विद्यार्थ्यांच्या चमूने टिकाव, फावडे यांच्या साह्याने बारव स्वच्छ केली.अनेक वर्षे पाठपुरावा करून देखील गावाच्या या ऐतिहासिक वास्तूला मोकळा श्वास घेता येत नव्हता. प्रशासकीय अडचणी आणि परवानग्या यात अनेक वर्षे बारव स्वच्छ होत नव्हती. विद्यार्थ्यांनी मात्र काही तासात बारव स्वच्छ केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यासाठी राष्टÑीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. महेश बनकर, प्रा. एस. सी. आहिरे, सचिन शिंदे, दर्शन दराडे, प्रदीप पगारे, भाऊसाहेब आढाव, मयूर जाधव, अजय कारे यांनी प्रयत्न केले.अहल्यादेवी होळकर यांनी दुरदृष्टीने अनेक गावांत पाण्यासाठी बारव बांधले. ज्या गावात बारव आहे. त्या गावांना नक्कीच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कचरा, माती, दगड यांनी भरलेला बारव विद्यार्थ्यांनी स्वच्छ करून एक प्रकारे ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करीत ती टिकविण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.- डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्य सायखेडा महाविद्यालय.