शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

विद्यार्थ्यांनी केली पुरातन बारव स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:01 IST

सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देसायखेडा : जुनी ऐतिहासिक वास्तू टिकविण्याची ग्रामस्थांची धडपड

सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.स्वामी षटकोपचार्य महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा संघाच्या माध्यमातून हिवाळी श्रम संस्कार शिबिरा निमित्ताने गावात साफसफाई करण्यासाठी ७ दिवस मुक्कामी आले आहेत. गावात मुख्य रस्ते आणि गल्ल्या कॉँक्रीेट केलेल्या असल्याने नेमके कोणते काम हाती घ्यावे असा विचार करत असतांना मुख्य समनव्यक प्रा. महेश बनकर गावात फेरफटका मारायला गेले असता गावालगत असलेली पुरातन बारव त्यांनी पाहिली गावकुसाला असलेली बारव हि गावासाठी अभिमानाची बाब आहे. शिवाय गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुढील पिढीला त्याची जाणीव व्हावी, विद्यार्थ्यांना सुद्दा बारव कशी आहे. आणि कोणत्या प्रकारचे बांधकाम आहे. याचा अभ्यास व्हावा म्हणून बारव स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. विद्यार्थ्यांच्या चमूने टिकाव, फावडे यांच्या साह्याने बारव स्वच्छ केली.अनेक वर्षे पाठपुरावा करून देखील गावाच्या या ऐतिहासिक वास्तूला मोकळा श्वास घेता येत नव्हता. प्रशासकीय अडचणी आणि परवानग्या यात अनेक वर्षे बारव स्वच्छ होत नव्हती. विद्यार्थ्यांनी मात्र काही तासात बारव स्वच्छ केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यासाठी राष्टÑीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. महेश बनकर, प्रा. एस. सी. आहिरे, सचिन शिंदे, दर्शन दराडे, प्रदीप पगारे, भाऊसाहेब आढाव, मयूर जाधव, अजय कारे यांनी प्रयत्न केले.अहल्यादेवी होळकर यांनी दुरदृष्टीने अनेक गावांत पाण्यासाठी बारव बांधले. ज्या गावात बारव आहे. त्या गावांना नक्कीच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कचरा, माती, दगड यांनी भरलेला बारव विद्यार्थ्यांनी स्वच्छ करून एक प्रकारे ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करीत ती टिकविण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.- डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्य सायखेडा महाविद्यालय.