शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सत्तासंघर्षात २८९ व्या आमदाराची ‘अशीही’ सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:13 IST

गेल्या सव्वा महिन्यापासून राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पडदा पडला आणि विधानसभेवर निवडून गेलेल्या २८८ आमदारांसह जनतेनेही दीर्घ सुस्कारा सोडला. राजकीय अनिश्चिततेच्या याच कालावधीत सिन्नर तालुक्याच्या पंचक्रोशीत लोकांच्या मनातील २८९ वे आमदार म्हणून परिचित असलेल्या जायगाव येथील महादू सखाराम गिते या ज्येष्ठाचीही महिनाभर सुरू असलेल्या टोमण्यांपासून सुटका झाली आणि त्यांचा हा आनंद ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केला.

ठळक मुद्देजायगावची इरसाल कथा : ग्रामस्थांनी एकत्र येत केला सत्कार

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : गेल्या सव्वा महिन्यापासून राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यावर अखेर गुरुवारी (दि.२८) शिवतीर्थावर झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पडदा पडला आणि विधानसभेवर निवडून गेलेल्या २८८ आमदारांसह जनतेनेही दीर्घ सुस्कारा सोडला. राजकीय अनिश्चिततेच्या याच कालावधीत सिन्नर तालुक्याच्या पंचक्रोशीत लोकांच्या मनातील २८९ वे आमदार म्हणून परिचित असलेल्या जायगाव येथील महादू सखाराम गिते या ज्येष्ठाचीही महिनाभर सुरू असलेल्या टोमण्यांपासून सुटका झाली आणि त्यांचा हा आनंद ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केला.गावकीचे राजकारण हे जसे सुडाचे तसेच ते मनोरंजनानेही भरलेले असते. गावातील पारावर रंगणाऱ्या गप्पांच्या फडात राजकारण हा प्रमुख विषय असतो. गावामधील काही लोक हे चेष्टेचाही विषय बनत असतात. गावातील इरसालपणाच्या गोष्टी रंजक असतात. असाच रंजकतेचा नमुना जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पहायला मिळाला. तालुक्यातील जायगाव येथील महादू गिते या ज्येष्ठ नागरिकाचे शिक्षण जेमतेम असले तरी राजकारणाच्या इतिहास-भूगोलात त्यांचे ज्ञान एखाद्या राजकीय तज्ज्ञ विश्लेषकापुढेही फिके पडावे असे आहे. म्हणून महादू गिते हे पंचक्रोशीत ‘आमदार’ या टोपण नावानेच परिचित आहेत. राज्याच्या राजकारणात गेल्या सव्वा महिन्यापासून सत्तेसाठी नाट्य सुरू होते. रोजच्या घटना-घडामोडी, सरकार स्थापनेला होणारा विलंब, संजय राऊत यांची रोजची पत्रकार परिषद, आमदारांची पळवापळवी यापासून ते कोण होणार मुख्यमंत्री, यापर्यंतच्या चर्चांना उधाण आले असताना त्यासंबंधीची विचारणा ग्रामस्थांकडून महादू गिते यांनाच केली जायची. महादू गिते दिवसभर जेथे जातील तेथे त्यांना काय आमदार, आज कुणाला पाठिंबा देणार, तुम्हाला कुणी पळवून नेले नाही का, असा प्रश्नांचा भडिमार करत ग्रामस्थ त्यांना भंडावून सोडत असत. महादू गितेही सुरुवातीला या टोमण्यांमुळे गमतीने घेत त्यांची उत्तरे द्यायचे. परंतु जसाजसा सत्तास्थापनेला विलंब होत गेला तशी त्यांची उत्तरे देताना तारांबळ उडायला लागली. अखेर गुरुवारी (दि.२८) मुंबईत शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा साºया महाराष्टÑाने जसा सुटकेचा नि:श्वास सोडला त्याहून अधिक दीर्घ सुस्कारा जायगावमधील गावकऱ्यांचे आमदार महादू गिते यांनी टाकला. महिनाभराच्या सत्तासंघर्षात टोमण्यांपासून सुटका झाल्याने महादू गिते यांना आनंद झाला आणि सत्तानाट्यावर पडदा पडल्याने ग्रामस्थांनीही त्यांच्या आनंदात सहभागी होत ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र जमत राज्यातल्या या अघोषित २८९ व्या आमदाराचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

टॅग्स :Politicsराजकारण