शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
3
“मोहन भागवत, PM मोदी शस्त्रपूजा करतात, सरकार ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार का?”: आंबेडकर
4
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
5
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
6
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
7
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
8
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
10
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर, नागपंचमी एकत्र? जाणून घ्या तारखा आणि 'अशी' करा तयारी!
11
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
12
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
13
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
14
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
15
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
16
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
17
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
18
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
19
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
20
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विभागाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:27 IST

नाशिक : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळेपासून नाळ तुटलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रयत्न चालविले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पर्यायांचा वापर करून शिक्षक पोहोचले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे सोपे झाले आहे.

नाशिक : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळेपासून नाळ तुटलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रयत्न चालविले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पर्यायांचा वापर करून शिक्षक पोहोचले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे सोपे झाले आहे.जिल्हा परिषदेच्या सुमारे तीन हजार प्राथमिक शाळा असून, अडीच लाखांच्या आसपास विद्यार्थी आहेत. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने यंदा वार्षिक परीक्षाही होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभाग व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्नांना सुरुवात केली आहे. विद्यार्थी-पालकांकडे स्मार्टफोनचा असलेला अभाव पाहता अन्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गावागावांत जाऊन विद्यादानाचे काम करीत आहेत.६० टक्के विद्यार्थी भ्रमणध्वनीविना; आॅनलाइन शिक्षणातील अडचणी संपेनाशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय ठेवला असला तरी, साधन सामुग्री अभावी अजूनही अडचणी येत आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या ४० टक्के पालकांकडे स्मार्टफोन आहेत, ६० टक्के विद्यार्थी त्यापासून वंचित आहेत.गावोगावच्या शिक्षकांकडून व विद्यार्थी, पालकांकडून मागविलेल्या माहितीनुसार पुरेशी साधने नसल्याने अन्य पर्यायांचा आधार घेतला जात आहे.--------------ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्याच्या माध्यमातून शिक्षकांचा विद्यार्थी व पालकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून, जे शिक्षक गावातच राहतात त्यांच्या करवी गावातील विद्यार्थ्यांसाठी शिकविण्यास सुरुवात झाली आहे.काही गावांमध्ये गावकऱ्यांनी एकत्र येत शाळांना दूरचित्रवाणी संच भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली असून, आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाºया सुरगाण्यात हा पहिलाच प्रयोग करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक