शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विभागाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:27 IST

नाशिक : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळेपासून नाळ तुटलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रयत्न चालविले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पर्यायांचा वापर करून शिक्षक पोहोचले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे सोपे झाले आहे.

नाशिक : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळेपासून नाळ तुटलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रयत्न चालविले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पर्यायांचा वापर करून शिक्षक पोहोचले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे सोपे झाले आहे.जिल्हा परिषदेच्या सुमारे तीन हजार प्राथमिक शाळा असून, अडीच लाखांच्या आसपास विद्यार्थी आहेत. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने यंदा वार्षिक परीक्षाही होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभाग व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्नांना सुरुवात केली आहे. विद्यार्थी-पालकांकडे स्मार्टफोनचा असलेला अभाव पाहता अन्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गावागावांत जाऊन विद्यादानाचे काम करीत आहेत.६० टक्के विद्यार्थी भ्रमणध्वनीविना; आॅनलाइन शिक्षणातील अडचणी संपेनाशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय ठेवला असला तरी, साधन सामुग्री अभावी अजूनही अडचणी येत आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या ४० टक्के पालकांकडे स्मार्टफोन आहेत, ६० टक्के विद्यार्थी त्यापासून वंचित आहेत.गावोगावच्या शिक्षकांकडून व विद्यार्थी, पालकांकडून मागविलेल्या माहितीनुसार पुरेशी साधने नसल्याने अन्य पर्यायांचा आधार घेतला जात आहे.--------------ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्याच्या माध्यमातून शिक्षकांचा विद्यार्थी व पालकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून, जे शिक्षक गावातच राहतात त्यांच्या करवी गावातील विद्यार्थ्यांसाठी शिकविण्यास सुरुवात झाली आहे.काही गावांमध्ये गावकऱ्यांनी एकत्र येत शाळांना दूरचित्रवाणी संच भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली असून, आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाºया सुरगाण्यात हा पहिलाच प्रयोग करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक