शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 9, 2016 22:41 IST

टॅँकरने पाणीपुरवठा : उन्हाळा काढायचा तरी कसा? बागलाणकर विवंचनेत

सटाणा : बागलाणचा पूर्वभाग आणि काटवन परिसर हा तसा कायमस्वरूपी टंचाईग्रस्त. मोसम, आरम, करंजाड, गिरणा खोरे पाण्याचे आगार म्हणून सर्वदूर परिचित. मात्र सलग दोन वर्षांपासून होणारा अपुरा पाऊस.. त्यातच पाण्यासारखा पैसा खर्च करूनही बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना.. यामुळे यंदा भरपावसाळ्यातच बागलाण टॅँकरच्या फेऱ्यात सापडला आहे. आजच्या घडीला तालुक्यात एकवीस गावांना बावीस टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हा शासकीय आकडा असला तरी, तालुक्यातील टंचाईचे वास्तव चित्र त्यापेक्षाही भयावह आहे. या टंचाईत अजून मार्च महिना काढायचा आहे. आगामी एप्रिल, मे महिना काढायचा कसा? या विवंचनेत सध्या बागलाणकर दिसत आहेत.बागलाण तालुका तसा विविध नैसर्गिक साधनसंपदेने नटलेला परिसर. सह्याद्री पर्वत रांगेत येणाऱ्या हा तालुका एकेकाळी पाण्यासाठी स्वयंपूर्ण होता. मोसम, आरम, गिरणा, हत्ती, कान्हेरी आणि करंजाडी या नद्यांमुळे हा परिसर सुजलाम् सुफलाम् होता. पाण्यामुळे या सहाही नद्यांचे खोरे उसाचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र कालांतराने निसर्गाचा लहरीपणा, पडणारा अपुरा पाऊस, पाण्याचा बेसुमार उपसा, अपुरे सिंचन प्रकल्प यामुळे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेला बागलाण टॅँकरच्या फेऱ्यात सापडल्याचे आजचे वास्तव आहे. बागलाण तालुक्यातील पूर्व आणि काटवन परिसरात सिंचन प्रकल्पांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांसाठी पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली. तरीदेखील टंचाईवर मात करून या भागातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम डाळींबबागा फुलवून आर्थिक सुबत्ता आणली. मात्र त्यावर तेल्या रोगाचे आक्र मण आणि सलग दोन वर्षांपासून होणााऱ्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई या दुहेरी कात्रीत सापडल्यामुळे डाळींबबागा दुष्काळाने होरपळत आहेत. या भागातील सारदे, रामतीर, सुराणे, रातीर, लोणारवाडी, किरायतवाडी, चिराई, राहुड, इजमाणे, बिजोरसे, चौगाव, कऱ्हे, वाघानेपाडा, अजमीर सौंदाणे ही गावे बारमाही टॅँकरग्रस्त आहेत. या गावांची शासन दप्तरी तशी नोंद असली तरी या भागातील बहुतांश गावातील महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव आहे.देवळाणे, वायगाव, मळगाव, महड, टेंभे या गावांना आठ आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा योजनांनी आत्ताच तळ गाठल्याने उन्हाळा काढायचा तरी कसा, असा प्रश्न सध्या नागरिकांना भेडसावत आहे.सटाणा तालुक्यातील मोसम, करंजाडी खोऱ्यातील नामपूर, फोपीर, खिरमानी, कुपखेडा, गोराणे, आनंदपूर, आखतवाडे, निताने, करंजाड, पिंपळकोठे या गावांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नामपूर हे ३५ हजार लोकसंख्येचे गाव. मोसमच्या तीरावर वसलेले हे गाव कधीकाळी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्या. यासाठी शासनाची भारत निर्माण योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनादेखील मंजूर झाली; मात्र ती योजना अपूर्णावस्थेत असल्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. @ बागलाण तालुक्यातील सारदे, नामपूर, रामतीर, पिंपळकोठे, इजमाणे, सुराणे, तरसाळी, खिरमानी, बिजोरसे, अजमीर सौंदाणे, चिराई, राहुड, चौगाव, पिंपळदर, रातीर, नवेगाव, कऱ्हे, जामनवाडी, किरायातवाडी, वाघानेपाडा, लोणारवाडी या एकवीस गावांना दररोज बावीस टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा हरणबारी धरण,आराई, ठेंगोडा, लेंडीनाला, रावळगाव येथून केला जात आहे.(वार्ताहर)