शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

रेशनदुकानदारांचा संप अखेर मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:05 IST

नाशिक : कोरोनासारखा महामारीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने सुरू केलेल्या धान्यवाटप मोहिमेचा एक घटक असलेल्या रेशनदुकानारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने अखेर मागील आठवड्यात पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बुधवार (दि.१०) पासून अन्नधान्य वितरण सुरू होणार आहे.

नाशिक : कोरोनासारखा महामारीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने सुरू केलेल्या धान्यवाटप मोहिमेचा एक घटक असलेल्या रेशनदुकानारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने अखेर मागील आठवड्यात पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बुधवार (दि.१०) पासून अन्नधान्य वितरण सुरू होणार आहे.मुंबईत एका रेशनदुकानदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आल्याने रेशनदुकानदारांनी विमा संरक्षणाची मागणी करीत संप पुकारला होता. त्यामुळे रेशनमधून वितरण होणारा धान्याचा पुरवठा थांबला होता. या संदर्भात रेशनदुकानदार संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.या संदर्भात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी संप करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगताना एखाद्या दुकानदाराचा कोरोनाची बाधा होवून मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच दिले जाईल. तसेच मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. अजित पवार यांच्या सूचनेनुसार दुकानदारांनी संप मागे घेत असल्याची घोषणाही केली. या बैठकीस विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे सचिव गोपाल मोरे आदी उपस्थित होते.-----------------------रेशनदुकानदारांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. अन्य मागण्यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. रेशनदुकानदार कोरोनाच्या काळात सरकारच्या सोबत आहे.- दिलीप तुपे, प्रदेश कार्याध्यक्ष, रेशनदुकानदार संघटना

टॅग्स :Nashikनाशिक