शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा खरीप पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:42 IST

खेडलेझुंगे/कसबेसुकेणे : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका द्राक्षबागांसह इतर खरीप पिकांना बसला असून पिकांच्या नुकसानीने बळीराजा हवालदिल झाला आहे. द्राक्षबागांमध्ये ...

खेडलेझुंगे/कसबेसुकेणे : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका द्राक्षबागांसह इतर खरीप पिकांना बसला असून पिकांच्या नुकसानीने बळीराजा हवालदिल झाला आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचू लागल्याने सडण्याची भीती व्यक्त केली जात असून ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका बसत आहे.खेडलेझुंगे, रु ई-धानोरे, कोळगाव, सारोळेथडी, धारणगाव परिसरासह पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, कूज, गळ या रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे झालेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी द्राक्षबागा तोडण्याच्या बेतात आहेत. परिसरातील नानासाहेब खडांगळे आणि राजेंद्र जाधव यांनी द्राक्षबागा तोडण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून नेल्याचे चित्र परिसरामध्ये आहे. काढणीला आलेला कांदा, मका, बाजरी, सोयाबीन व भुईमूग या पिकांना या पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात पाणी साचल्याने काढणी केलेले बाजरी पीक पावसापासून वाचविण्यासाठी महागडे प्लॅस्टिक कागद खरेदी करून झाकण्यात आले; परंतु पंधरवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीतील ओल कायम राहिली. त्यातच शेतातून काढणी केलेल्या बाजरीच्या कणसांना सुकण्यासाठी ऊन मिळाले नाही. काढणी केलेली कणसे पावसापासून वाचविण्यासाठी एका ठिकाणी गंज करून झाकण्यात आली; परंतु कणसांना जमिनीतून ओल मिळाल्याने सदरच्या कणसांना मोठ्या प्रमाणावर कोंब फुटले. त्यामुळे मरळगोई येथील प्रमोद दरेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचा महसूल आणि कृषी विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणे गरजेचे आहे. सदर पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. दिवाळी सणामुळे सुट्टीवर गेलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने हजर होऊन पंचनामे करणे गरजेचे असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली. सततच्या पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी, बुरशींच्या मोठ्या प्रमाणावरील प्रादुर्भावामुळे द्राक्षबागांवर कुºहाड लावण्याची वेळ बºयाच शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. रु ई-धानोरे येथील नानासाहेब खडांगळे यांनी द्राक्षबागांवर डावणी व बुरशी आल्याने सुमारे दीड एकर द्राक्षबाग तोडून टाकली. बुरशी व डावणीमुळे त्यांचा द्राक्षबाग पूर्णत: संपल्याने त्यांना द्राक्षबाग तोडून टाकावी लागली आहे. छाटणी ते द्राक्ष डिपिंगपर्यंतचा खर्च आणि आज द्राक्षबाग तोडण्यासाठी २ ते ३ रु पये प्रतिझाडाच्या खर्चामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी. जर तसे झाले नाही तर शेतकºयांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसेल, असे रूई-धानोरे येथील द्राक्ष उत्पादक नानासाहेब खडांगळे यांनी सांगितले. द्राक्ष पिकांसाठी औषधे व खतांचा मोठा खर्च झाला असून, शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील पिकांचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.धारणगाववीर व खडक परिसरामध्ये नवरात्र आणि दीपावली सणाचे औचित्य साधून झेंडूची लागवड करण्यात आली होती. झेंडूच्या फुलांना भाव मिळून पैसा मिळेल यादृष्टीने लागवड केलेल्या झेंडूला परतीच्या पावसाने शेतकºयांची निराशा केली. परतीच्या पावसाच्या तीव्रतेमुळे झेंडूचे नुकसान झाले आहे. झेंडूच्या झाडांची मोडतोड झाली आहे. त्यावरील फुले मातीमिश्रित झाल्याने धारणगाव खडक येथील सुभाष जाधव यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतावर काढणी केलेले पीक पावसामुळे सुरक्षित ठिकाणी वाहतूक करता येत नसल्याने शेतातच सडू लागले आहे. मका, बाजरी, भुईमुगाला कोंब फुटले आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे चाºयाची टंचाई निर्माण झाली होती; परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे चारा जमिनीवरच पडून असल्याने सडू लागला आहे. त्यामुळे यावर्षी चाराटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. परतीच्या पावसाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, चाºया, पाट, कालवे तुडुंब भरून वाहत आहेत. जास्तीचे पाणी शेतात साचून असल्याने शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक