शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

जिल्ह्यात आज रात्रीपासून लागणार कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:42 IST

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून रात्री ८ वाजेनंतर मेडिकल्स वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून केली जाणार असून ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध राहाणार  असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नाशिक :  राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून रात्री ८ वाजेनंतर मेडिकल्स वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून केली जाणार असून ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध राहाणार  असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना आणखी झपाट्याने वाढणार असल्याचा निष्कर्ष आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे असलेले निर्बंध अधिक काटेकोर आणि कठोर करण्यात आलेले आहे. यामध्ये नागरिकांनी तसेच विविध प्रकारच्या आस्थापनांनी नियमांचे पालन करावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात यापूर्वीच काही निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आता त्यामध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.  उद्योग व्यवसाय सुरू राहतील, मात्र यासाठी कोरोना नियमांचे पालन करून कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना बाधित सोसायट्यांना दंडकोरेानाबाधित असलेल्या सोसायटी इमारतींमध्ये नियमांचे पालन होत नसेल तर त्यांना देखील दहा हजाराचा दंड केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. बांधकामावरील मजुरांना कामावर बोलवितांना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संबंधित बांधकाम व्यावसायिकाने केली पाहिजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्याचे देखील सुचविण्यात आलेले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या