शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लॉकडाऊन नव्हे तर निर्बंधांची कठोर अंमलबजावणी हवी : छगन भुजबळ

By अझहर शेख | Updated: March 18, 2021 14:03 IST

विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाईल, असा आशावाद भुजबळ यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्थचक्र थांबवायचं नसेल तर निर्बंधांचे पालन कराकोरोनाग्रस्त रुग्णांचा दर वाढून ३२ टक्क्यांवरमालेगाव मनपा आयुक्तांना रजा रद्द करुन हजर राहण्याच्या सुचनामालेगावात दाहक परिस्थिती, विशेष लक्ष पुरवा

नाशिक : शहर व जिल्ह्यात झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच कोरोनाचा कहर सुरु झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांसोबत तत्काळ गुरुवारी (दि.१८) आढावा बैठक बोलविली. या बैठकीत भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व खातेप्रमुखांना कोरोनाच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही, कोणीही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, असा इशारा दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या आढावा बैठकीप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव हे प्रमुख अधिकारी उपस्थित आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सर्वच विभागांना कंबर कसावी लागणार आहे. कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणीवर भर देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी स्वैर वागणे सोडावे, आणि नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी सरकारी यंत्रणांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. कोविडविरुध्द लढ्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, चालढकल किंवा जबाबदारी झटकण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी रोखठोकपणे सांगितले. कोविड रुग्णांच्या विलगिकरणाकरिता रुग्णालयांची मदत घ्यावी. दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर ह्यवॉचह्ण ठेवून त्यांची दुकाने बंद करण्याची शिक्षा करावी, जेणेकरुन अन्य व्यावसायिकांनाही धडा मिळेल, असे भुजबळ यांनी सांगितले. लॉकडाऊन हा पर्याय कोणाच्याही फायद्याचा नसून त्याऐवजी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. विलगीकरण केंद्र वाढवून नियमांप्रमाणे लसीकरणावर भर द्यावा. जिल्हाधिकारी आदेश काढतात मात्र खालच्या सर्व यंत्रणांकडून त्या आदेशांची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे, अन्यथा आदेश केवळ कागदोपत्री राहतात, असेही भुजबळ यांनी या बैठकीत अधोरेखित केले. लहान-लहान प्रतिबंधित क्षेत्रे (कन्टेंन्मेंट झोन) तयार करुन घराबाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर कारवाई पोलीस व मनपाने संयुक्तपणे करावी. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कोविडविरुध्दच्या या लढ्यात उतरुन युध्दपातळीवर काम करत पंधरवड्यात यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणाविनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाईल, असा आशावाद भुजबळ यांनी व्यक्त केला. मास्कचा वापर गर्दीमध्ये सहभागी होणे टाळणे, सामाजिक अंतर राखणे ही त्रिसुत्री नाशिकरांनी काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले, तरच आपण लॉकडाऊनचे घोंगावणारे संकट दूर करु शकतो, असे त्यांनी नाशिककरांना उद्देशून सांगितले. 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयChagan Bhujbalछगन भुजबळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस