शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कडक अंमलबजावणीमुळे बाधितांच्या संख्येला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:13 IST

निफाड तालुक्यातील मागील महिन्यात कोरोना रुग्णांची दररोज किमान ३०० पेक्षा जास्त संख्या वाढत होती. निफाड तालुका हा संपूर्ण ...

निफाड तालुक्यातील मागील महिन्यात कोरोना रुग्णांची दररोज किमान ३०० पेक्षा जास्त संख्या वाढत होती. निफाड तालुका हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक असणारा तालुका ठरला होता. आता पाच- सहा दिवसांपासून ती संख्या एकशे तीस रुग्णांवर आलेली दिसत आहे. निफाड तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे व गट विकास अधिकारी संदीप कराड यांनी निफाड तालुक्यात कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आणि गावोगावी धडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. इतकेच नव्हे तर बाजारावर होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस शेतीमालाचे लिलाव बंद असल्याने प्रशासनाला कोरोना रोखण्यात कमालीचे यश आले. आणि त्याचबरोबर घोरपडे यांनी निफाड तालुक्यातील गावोगावी कोरोना रुग्ण असणारा परिसरातील रुग्ण घराबाहेर पडू नये व घरातच असावेत, कोरोना फैलाव होऊ नये यासाठी गावोगावी प्रतिबंध क्षेत्राकरिता एक पोलीस कर्मचारी व दोन शिक्षकांची नेमणूक केली व या अंमलबजावणीनंतर कोरोना रुग्ण आढळणाऱ्या परिसरात प्रतिबंध क्षेत्रावर अनिर्बंध व अंमलबजावणी सुरू झाली आहे.

दि.१५ मे रोजी रात्री शासकीय आकडेवारी उपलब्ध झाली असून नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १ हजार ८४५, बागलाण ५४७, चांदवड ५६९, देवळा ४८८, दिंडोरी ७३४, इगतपुरी १८४, कळवण ४९३, मालेगाव २९१, नांदगाव २८८, निफाड १ हजार ४, पेठ ८९, सिन्नर १ हजार ७५, सुरगाणा २९१, त्र्यंबकेश्वर १७३, येवला १४८ असे एकूण ८ हजार २१९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता निफाड तालुक्यातील जनता मास्कसह फिरताना दिसत आहे. मात्र, या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे लोक कोरोनाबाबत आता चिंतेची बाब म्हणून पाहत आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत निफाड, सायखेडा व विंचूर येथील बाजार आवारांवर दररोज कांदा व शेतीमालाचे लिलाव होतात. यामुळे देखील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे, असे दिसून येताच लासलगाव येथील बाजारपेठेत सलग दोन आठवडे तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीने एक सप्ताहात लिलाव बंद ठेवले आहेत, तसेच अनपेक्षित निकटचे नातेवाईक व मित्र यांच्या कोरोना पाॅझिटिव्ह अहवालानंतर मागील सप्ताहात मृत्यूच्या घटनेने तालुक्यातील जनता हादरली. आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यात शेतीमालाचे लिलाव दि.13 ते मे दरम्यान बंद झाले आहेत. गावोगावी जनता कर्फ्यू शंभर टक्के पाळला जात आहे.