शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:49 IST

नाशिक : बागलाण तालुक्यातील रेशन दुकानदार महिलेला सरपंचाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून, नाशिकसह राज्यातील रेशन दुकानदारांना होत असलेल्या मारहाणीच्या घटना पाहता, सरकारने दुकानदारांना संरक्षण द्यावे अन्यथा बेमुदत दुकाने बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बागलाण तालुक्यातील रेशन दुकानदार महिलेला सरपंचाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून, नाशिकसह राज्यातील रेशन दुकानदारांना होत असलेल्या मारहाणीच्या घटना पाहता, सरकारने दुकानदारांना संरक्षण द्यावे अन्यथा बेमुदत दुकाने बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महिला दुकानदारास मारहाण करणाऱ्यास अटक करण्यात आल्याने गुरुवारपासून नियमित दुकाने उघडी राहतील, अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली.बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथे मंगळवारी सदरचा प्रकार घडला होता. गावातील रेशन दुकानदार महिलेने शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना ८० टक्के धान्याचे वाटप केलेले असताना गावातील सरपंचाने रेशन दुकानदाराकडे मोफत तांदळाची मागणी केली असता त्यास नकार देण्यात आल्याने सरपंचाने दुकानदार महिलेस मारहाण केली. त्याचबरोबर दुकानातील धान्य स्वत: उचलून नेले. यापूर्वीही त्र्यंबकेश्वर येथे रेशन दुकानदारास माहाण झालेली असल्यामुळे लागोपाठच्या या घटनांमुळे रेशन दुकानदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेने बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी नाशिक शहरासह जिल्ह्यातील २६०० रेशन दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. रेशन दुकानदारांच्या या बंदमुळे लॉकडाउनचा सामना करीत असलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागले. अचानक बंद पाळण्यात आल्याने व त्याची कोणतीही माहिती जनतेला नसल्यामुळे बुधवारी नेहमीप्रमाणे धान्य घेण्यासाठी नागरिकांनी रेशन दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या, परंतु वेळ उलटून गेल्यावरही दुकान उघडत नसल्याचे पाहून त्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले.मारहाणप्रकरणी सरपंचास अटक करण्यात आल्याने गुरुवारपासून नियमितपणे दुकाने उघडावी, असे आवाहन निवृत्ती कापसे यांनी केले आहे.------------------------------संपाचा इशारारेशन दुकानदारांवर होत असलेले हल्ले थांबविण्यासाठी शासनाने दुकानदारांना पोलीस संरक्षण द्यावे, त्याचबरोबर दुकानदारांना आरोग्य विम्याचा लाभ द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक