शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे : नरेंद्राचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:55 IST

मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल.

ठळक मुद्देजीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे काही चुका आपण स्वत: जाणून बुजून करतोआपले मन मजबूत केल्यास दु:ख निर्माण होत नाही.

नाशिक : मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल. यासाठी अंतर्मन बिहर्मन एकत्र करावे यामुळे मनाला स्थैर्य निर्माण होईल व आपले प्रश्न आपोआप सुटतील. असे, प्रतिपादन रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी समस्या मार्गदर्शन प्रवचन दर्शन सोहळयाप्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना केले.      उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आशेवाडी जवळील जनम संस्थानाच्या आश्रमात मंगळवारपासून दोन दिवसीय प्रवचन, दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी असे सांगितले की, जीवनात दु:ख येण्याचे याचे कारण म्हणजे आपल्या वागण्यात असलेला दुष्परिणाम आहे. काही चुका आपण स्वत: जाणून बुजून करतो चुका होऊ नये म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात यावे. गुरूंच्या कृपेने दु:ख निवारणाची क्षमता निर्माण होते आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. सुख दु:खाला कसे सोडून द्यायचे किंवा कवटाळायचे हे स्वत:वर अवलंबून आहे. आपले मन मजबूत केल्यास दु:ख निर्माण होत नाही. संयम, चिकाटी, साधक बाधक विचार करता आला पाहिजे. प्रत्येकाचे शरीर व प्रत्येकात चैतन्य सारखेच असते. तुम्ही स्वत: देव आहे आणि तुमचे देवत्व तुमच्या कृतीतून दिसते. अनुभूती केवळ गुरूंच्या सहवासात येते. देवाजवळ पैशांची गरज नसते देव भक्तीचा भुकेला असतो. गुरु प्रती दृढ विश्वास ठेवणे गरजेचे आहे.रोज दहा मिनिटे भक्ती करावी. स्वप्नात कुणाचे वाईट चिंतू नये व कुणाला फसवू नये कुणाला त्रास होणार याची काळजी प्रत्येक भक्तांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAdhyatmikआध्यात्मिक