शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे : नरेंद्राचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:55 IST

मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल.

ठळक मुद्देजीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे काही चुका आपण स्वत: जाणून बुजून करतोआपले मन मजबूत केल्यास दु:ख निर्माण होत नाही.

नाशिक : मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल. यासाठी अंतर्मन बिहर्मन एकत्र करावे यामुळे मनाला स्थैर्य निर्माण होईल व आपले प्रश्न आपोआप सुटतील. असे, प्रतिपादन रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी समस्या मार्गदर्शन प्रवचन दर्शन सोहळयाप्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना केले.      उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आशेवाडी जवळील जनम संस्थानाच्या आश्रमात मंगळवारपासून दोन दिवसीय प्रवचन, दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी असे सांगितले की, जीवनात दु:ख येण्याचे याचे कारण म्हणजे आपल्या वागण्यात असलेला दुष्परिणाम आहे. काही चुका आपण स्वत: जाणून बुजून करतो चुका होऊ नये म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात यावे. गुरूंच्या कृपेने दु:ख निवारणाची क्षमता निर्माण होते आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो. सुख दु:खाला कसे सोडून द्यायचे किंवा कवटाळायचे हे स्वत:वर अवलंबून आहे. आपले मन मजबूत केल्यास दु:ख निर्माण होत नाही. संयम, चिकाटी, साधक बाधक विचार करता आला पाहिजे. प्रत्येकाचे शरीर व प्रत्येकात चैतन्य सारखेच असते. तुम्ही स्वत: देव आहे आणि तुमचे देवत्व तुमच्या कृतीतून दिसते. अनुभूती केवळ गुरूंच्या सहवासात येते. देवाजवळ पैशांची गरज नसते देव भक्तीचा भुकेला असतो. गुरु प्रती दृढ विश्वास ठेवणे गरजेचे आहे.रोज दहा मिनिटे भक्ती करावी. स्वप्नात कुणाचे वाईट चिंतू नये व कुणाला फसवू नये कुणाला त्रास होणार याची काळजी प्रत्येक भक्तांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAdhyatmikआध्यात्मिक