शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पथकर नाक्यांची भग्नावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:28 IST

नांदगाव : गेले ते दिवस... उरल्या त्या अडचणी.... अशी अवस्था जिल्ह्यातील अनेक पथकर वसुली नाक्यांची झाली आहे. ज्याठिकाणी गती कमी करून व थांबून पथकर भरावा लागत असे. तिथल्या नाक्यांची मुदत संपल्याने ठेकेदार वसुलीसाठी उभारलेली बांधकामे तशीच ठेवून निघून गेले आहेत.

नांदगाव : गेले ते दिवस... उरल्या त्या अडचणी.... अशी अवस्था जिल्ह्यातील अनेक पथकर वसुली नाक्यांची झाली आहे. ज्याठिकाणी गती कमी करून व थांबून पथकर भरावा लागत असे. तिथल्या नाक्यांची मुदत संपल्याने ठेकेदार वसुलीसाठी उभारलेली बांधकामे तशीच ठेवून निघून गेले आहेत. त्यामुळे येथील वास्तूंचे भग्नावशेषात रु पांतर झाले आहे. मोडकळीस आलेल्या भिंती, तुटलेले दरवाजे, खिडक्या यांच्या जवळ काही ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या मद्याच्या बाटल्या तेथील तळीरामांच्या अस्तित्वाच्या साक्षीदार ठरतात. तर सिगारेट, बिडी पिण्याची तल्लफ भागविणारे महाभाग, पत्ते खेळतांना भिंतींच्या आडोशामागे दिसतात. वाहनातून जाणाऱ्या प्रवाशांना हे दूरदर्शन नित्याचे झाले आहे. मनमाड- चांदवड रस्त्यावर वसुलीसाठी उभारलेली अशीच एक टपरी मोडून रस्त्यावरच येऊन पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. शासनाबरोबरचे करार काही कारणांमुळे मोडीत निघाल्याने अनेक ठिकाणी टोल वसुलीसाठी उभारलेली बांधकाम्रे वाहनांना त्रासदायक ठरत आहेत. करार संपुष्टात आल्यानंतर उभारलेले स्ट्रक्चर तसेच रस्त्यावर उभे असते. नाक्यावरचे गतिरोधक वाहनांना अडथळे ठरत असतात. करार संपल्यानंतर उभारलेली बांधकामे ठेकेदाराने स्वत: काढून घेण्यासंबंधी करारात तरतूद असायला हवी. तशी ती असेल तर बांधकामे का काढून घेतली जात नाहीत. हा संशोधनाचा विषय आहे. जर बांधकामे काढून घेण्याची तरतूद नसेल तर संबंधित विभागाने ती काढून घ्यायला नको का ? मोडकळीस आलेले अवशेष रस्त्याच्या सौंदर्यास बाधा ठरत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक