शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कांदा चाळींची साठवणूक क्षमता संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:23 IST

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देसंख्या वाढवावी : सभापतींचे कृषिमंत्र्यांना पत्र

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात सोमवारी बनकर यांनी भुसे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात देशात अग्रस्थानी असून, कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्णात घेतले जाते.देशात सर्वसाधारणपणे ७.६० लाख हेक्टरवर कांदा पीक घेतले जाते. त्यापैकी जवळजवळ ३५ टक्के म्हणजे २.६६ लक्ष हेक्टरवर कांदा पिकाची लागवड ही फक्त नाशिक जिल्ह्यात केली जाते. त्यामधून सर्वसाधारण ६९ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी उन्हाळी लागवड केलेल्या कांद्याची फक्त साठवणूक केली जाते. साधारणपणे ५४ लाख मेट्रिक टन उन्हाळी कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्णात होते. जिल्ह्यात विविध योजनांमधून उभारलेल्या व खासगी कांदा चाळींची संख्या जवळपास ५६३८६ इतकी आहे. त्यांची साठवण क्षमता साधारणपणे ११.७३ लाख मेट्रिक टन इतकी आहे.जिल्ह्यात उत्पादन होणाºया उर्वरित ४२.२७ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादनाचे साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणी लक्षांक वाढवून देण्यात यावे आणि त्याकरिता लागणारे वाढीव अनुदान देण्यात यावे जेणेकरून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना होईल, असे बनकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा