शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

चार महिन्यांपासून मनपाकडून बाजार शुल्क वसुली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:54 IST

नाशिक : फेरीवाला क्षेत्रच अस्त्विात नसताना बाजार शुल्क वसुली करणे महापालिकेच्या अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात फटकारल्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण शहरातील बाजार फीवसुली थांबली असून, त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयांचा फटका : न्यायालयाकडून कानउघडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : फेरीवाला क्षेत्रच अस्त्विात नसताना बाजार शुल्क वसुली करणे महापालिकेच्या अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात फटकारल्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण शहरातील बाजार फीवसुली थांबली असून, त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणानुसार प्रशासनाने शहरात सुमारे चारशे फेरीवाला क्षेत्र तयार केले आहेत. त्यापैकी अवघे चाळीस क्षेत्रच कार्यान्वित आहेत. उर्वरित ठिकाणी फेरीवाले कोणत्याही परवानगीशिवाय व्यवसाय करीत आहेत. दरम्यान, महापालिकेच्या वतीने अशाप्रकारे फेरीवाला क्षेत्र नसलेल्या भागात बाजार फीवसुली करण्यात येत असल्याने यासंदर्भात एका प्रकरणात प्रशासनाची कान उघडणी केली. डॉन बॉस्कोजवळील शाळेजवळ रस्त्यावर महापालिकेने फेरीवाल्यांना जागा दिल्यानंतर शिक्षण संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर मनपाने फेरीवाले अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले, तर फेरीवाल्यांनी जर आम्ही अधिकृत नव्हतो तर मग बाजार फी वसूल का केली? असा प्रश्न केला होता. त्या आधारे उच्च न्यायालयाने महापालिकेची कान उघडणी केली होती. जर फेरीवाला क्षेत्र अनधिकृत नसेल तर त्यांच्याकडून फी वसूल कशी काय करता येईल, असा प्रश्न मनपाने केल्यानंतर प्रशासनाची अडचण झाली असून, त्यामुळे शहरातील बाजार फी वसुली पूर्णत: बंद करण्यात आली आहे. रस्त्यावर कोठेही दुकान थाटणाऱ्यांकडून महापालिकेच्या वतीने बाजार शुल्क वसूल केली जाते. मात्र हे भूई भाडे असल्याचे सांगितले जात असते. मात्र जर बेकायदेशीररीत्या दुकान थाटले असेल तर भूई भाडे कसे काय वसूल करता येईल, असा मूळ प्रश्न आहे.महापालिकेला बाजार फीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, फी वसुली सध्या बंदच असल्याने महापालिकेचे महिन्या काठी दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान होत आहे. प्रशासन यावर लवकर तोडगा काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका