शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आपले सरकार सेवा केंद्र परीचालकांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:28 IST

ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षातत्र ३ ते ६ हजार रु पये पर्यंत मानधन मिळते. ते सुध्दा ६महिन्यापासुन रखडले आहे. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे आॅनलाईन कामकाज ठप्प होणार आहे.विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले, उतारेसाठी ग्रामस्थांची अडचण निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देमानधन रखडले : शासनप्रणित सी.एस. सी. एस.पी.व्ही. कंपनीवर रोष

साकोरा : ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षातत्र ३ ते ६ हजार रु पये पर्यंत मानधन मिळते. ते सुध्दा ६महिन्यापासुन रखडले आहे. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे आॅनलाईन कामकाज ठप्प होणार आहे.विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले, उतारेसाठी ग्रामस्थांची अडचण निर्माण होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा ‘‘ड’’ घरकुल यादीचा सर्वे देखील जिल्ह्यातील संगणक परीचालक करीत होते. काम बंद आंदोलनामुळे आवास योजनेच्या कामावर देखील परीणाम झालेला दिसून येत आहे. एकीकडे शासन डिजिटल इंडिया , डिजिटल महाराष्ट्र करत आहे. परंतु डिजिटल इंडिया करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परीचालक हा महत्वाचा घटक आहे. संगणक परीचालकांनी अनेक आंदोलने केली आहे. परंतु शासनाने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत सी.एस. सी. एस.पी.व्ही. कंपनीला पाठीशी घालुन संगणक परीचालकांवर अन्याय करत आहे.तरी सर्व थकीत मानधन संगणक परीचालकांना मीळावे, पंचायत समतिी मधील संगणक परीचालकांना आपले सरकार प्रकल्पामध्ये सामावुन घ्यावे अशा प्रकारचे निवेदन नाशिक जिल्हा सरचिटणीस सोमनाथ उडकुडे , नांदगाव तालुका अध्यक्ष दिपक त्रिभुवन , उपाध्यक्ष विजय आहेर सचिव राकेश ताडगे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.यावेळी तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.कंपनीच्या अनागोंदीमुळे मानधन ठप्पजिल्हयातील संगणक परीचालक यांचे एप्रिल,मे,जून २०१७ चे मानधनाचे पैसे कंपनीला जाऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेले तरी कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे अजून मानधन प्राप्त झाले नाही. ग्रामपंचायत मधून मागील मिहन्याचे चेक जिल्हा परीषदेला जमा करून पण अद्याप जून मिहन्यापर्यंतचे मानधन झालेले नाही. जिल्ह्यात ग्रामपंचायत मार्फत जुलै २०१८ पासून पुढील महिन्याचे चेक पूर्ण ग्रामपंचायत चे अद्याप जमा झालेले नाही त्यामुळे पुढील मानधन कसे होणार व कधी होणार याची शाश्वती नाही. काही संगणक परीचालकांचे इनव्हाईस डिममध्ये गेल्याने सदर महिन्यातील मानधन झालेले नाही.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक