शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

निफाडला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:38 IST

निफाड : शेतमालाला हमीभाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी निफाड येथील नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी लिलावासाठी आणलेला कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला तसेच निफाड शहर दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. सध्या शेतकºयांचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देऊन राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात निफाड शहर व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देबंद यशस्वी कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध

निफाड : शेतमालाला हमीभाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी निफाड येथील नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी लिलावासाठी आणलेला कांदा रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला तसेच निफाड शहर दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.सध्या शेतकºयांचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देऊन राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकºयांनी आंदोलन केले. या आंदोलनात निफाड शहर व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी भाजपाला हिंदूंचे राज्य आणून जातीयवाद जन्माला घालायचा असल्याचा आरोप करून आमच्या सरकारच्या काळात उसाला २३०० रुपये भाव होता तो आज १६०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असून, शेतकºयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर केले.यावेळी अनिल कुंदे, लासलगाव बाजार समिती संचालक सुभाष कराड, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, भीमराज काळे यांनीही आपल्या मनोगतातून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. याप्रसंगी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले, या निवेदनात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांचा शेतकरीविरोधी प्रतिक्रियेवर कारवाई करावी, शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, डिझेलवर अनुदान मिळावे, बिबट्यांचा बंदोबस्त करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा, शेतमालाला उत्पादनावर आधारित हमीभाव मिळावा आदी मागण्या केल्या आहेत. या आंदोलनात राजेंद्र बोरगुडे, नगरसेवकदेवदत्त कापसे, वाल्मीक कापसे, बापूसाहेब कुंदे, जानकीराम धारराव, नंदू कापसे, कृष्णा नागरे, सहभागी झाले होते.४सकाळी १० वा शांतीनगर चौफुली येथे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकरी जमा झाले. लिलावासाठी आणलेले कांदे रस्त्यावर ओतले. नाशिक व येवला मार्गावर कांद्याचे ट्रॅक्टर, बैलगाडी आडवी लावण्यात येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे नाशिक, औरंगाबाद, पिंपळगाव बसवंतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १२ वाजेपर्यंत बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र निफाड बंदमुळे सकाळी आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीला आणला नाही. व्यापाºयांनी दुकाने लावली नाहीत आंदोलन मागे घेतल्यानंतर दुपारी१२ नंतर आठवडे बाजार भरवण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmer strikeशेतकरी संप