शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको

By admin | Updated: September 8, 2015 23:15 IST

मनमाड : नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

मनमाड : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, पिण्याचे पाणी व जनावरांसाठी तीव्र चाराटंचाई याकडे शासनाचे लक्ष वेधून नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ८) मनमाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर व राज्य सरचिटणीस राजाभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली छावाच्या वरद संकुलमधील कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. दुष्काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही तालुक्यात रोजगार उपलब्ध करून द्यावा, जे लोक जनावरे सांभाळतात त्यांचा समावेश रोजगार हमीत करावा, ग्रामीण भागातून शाळा-महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास द्यावे, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार पूनम दंडिले व पोलीस निरीक्षक भागवत सोनवणे यांना देण्यात आले. दुष्काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा विलास पांगारकर व राजाभाऊ पवार यांनी भाषणातून समाचार घेतला. असंख्य आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष संजय नाठे, तालुकाध्यक्ष सुधाकर पवार, दिनकर काळे, मनमाड शहर कार्याध्यक्ष देवराम सदगीर, रवि भारद्वाज, सुभाष लभडे, समीर पठाण, राजू पठाण, लकी चव्हाण, साहेबराव खताळ, बापू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)