शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:39 IST

: नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नेहमीच होणाऱ्या या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नेहमीच होणाऱ्या या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधक बसविण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको केल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.  सिन्नर सोनांबे येथील हिराबाई बाळासाहेब वारुंगसे (४५) या गुरुवारी सायंकाळी मुलासोबत मोटारसायकलवरून पळसे येथे कामानिमित्त आल्या होत्या. सायंकाळी ६.३० च्या सुमारास सर्व्हिसरोडवरून पळसे चौफुलीवर महामार्गावर मोटारसायकल जात असताना सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा मालट्रक (एमएच १५ बीजी ९१५१) हिने मोटारसायकल (एमएच १५ एआर ५७६५) हिला जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून हौशाबाई वारुंगसे जागीच ठार झाल्या. या भीषण अपघातामुळे येणारे-जाणारे व बघणारेदेखील घाबरून गेले होते.  अपघात व रास्ता रोकोची माहिती मिळताच नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन जोपर्यंत गतिरोधक टाकण्याबाबत स्पष्ट सांगत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पेचप्रसंग निर्माण झाला होता. पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. ढोकणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी फोनवरून बोलून त्यांना घटनास्थळी बोलविले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पळसे ग्रामस्थांना शुक्रवारी गतिरोधक टाकण्याचे आश्वासन देत लेखीदेखील लिहून दिले. त्यानंतर एक-दीड तासाने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. नंतर हळूहळू अर्ध्या तासाने महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षपळसे कमानीजवळील चौफुलीवरील महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असतात. त्या ठिकाणी गतिरोधक टाकावे अशी अनेक दिवसांची ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्गाच्या दोन्ही बाजुला अचानक ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा