शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रेल रोको

By admin | Updated: May 13, 2015 01:19 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रेल रोको

नाशिकरोड : भूसंपादन कायदा हा देशातील शेतकऱ्यांचे शोषण करणारा असून, तो तातडीने रद्द करावा व जिल्ह्यातील अन्यायकारकरीत्या अधिग्रहित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना त्वरित मिळाव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले.अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्या या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई-भुसावळ पॅसेंजरसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता हंसराज वडघुले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे रेल रोको आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय येथे निदर्शने करून विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इंडिया बुल्स या कंपनीच्या रेल्वे ट्रॅकसाठी नाशिक व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाच हजार एकर जमीन अधिग्रहित केली आहे, एमआयडीसी कायद्याचा वापर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. जिल्ह्यात रेल्वे व हायवेसाठी बेकायदेशीररीत्या जमिनीवर डिमार्केशन केले जात असून, ते त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी गोविंद पगार, नितीन रोठे-पाटील, शरद लभडे, किरण देशमुख, सोमनाथ बोराडे, हेमंत पागेरे, प्रभाकर भोसले, नीलेश कुसमोडे, हिरामण वाघ, विकी गायधनी आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.