शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
5
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
6
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
7
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
8
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
9
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
10
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
11
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
12
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
13
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
14
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
15
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
16
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
17
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
18
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
19
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
20
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप

वीजपुरवठा खंडित धाडसत्र योजना थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:36 IST

पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागामार्फत शेतकऱ्यांचे रोहीत्र विद्युतपंप आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र सुरू असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे धाडसत्र त्वरित थांबावा असे निवेदन शेतकरी वर्गाने पिंपळगाव महावीरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी उपअभियंता विशाखा गायकवाड यांना दिले आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन

पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागामार्फत शेतकऱ्यांचे रोहीत्र विद्युतपंप आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र सुरू असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे धाडसत्र त्वरित थांबावा असे निवेदन शेतकरी वर्गाने पिंपळगाव महावीरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी उपअभियंता विशाखा गायकवाड यांना दिले आहे.सतत पाच ते सात वर्षांपासून अस्मानी, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून कोरोना सारख्या जनसंसर्ग रोगाने देशात थैमान घातले. या सर्व संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षाच्या संकटातून शेतकरी बाहेर येतोच नाही तर यावर्षी अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्यांचे द्राक्ष, गहु, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यात महावितरण विभाग व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भवती वीजपुरवठा खंडित करत धाडसत्र सुरु केले आहे. विजबिले भरले नाहीतर रोहित्र, विद्युतपंप व लाईट कट करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

सरकाने शेतकऱ्यासाठी ५० टक्के बिले भरून संपूर्ण वीज बिल माफीची योजना सुरू केली आहे. मात्र त्या योजनेची अध्यपही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्रास सुरु असलेली धाडसत्र योजना त्वरित थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था झुगारुन महावितरणच्या विरोधात रस्त्यावर यावे लागेल, असे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेयावेळी देवेंद्र काजळे, कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ, मधुकर ताकाटे, रमेश गायकावाड, मनोज मोरे, निवृत्ती ताकाटे, गणपत जगताप, अशोक मेधणे, बाळासाहेब जाधव, जालिंदर बनकर, वैभव केणे आदी उपस्थित होते.आसमानी संकटांनी व कोरोना वायरसमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे त्यात महावितरण विभाग व महाविकास आघाडी सरकारने जे धाडसत्र योजना सुरु केली आहे ती थांबवा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल म्हणुन शेतकऱ्याच्या गरजा व भावना लक्षात घ्या. आणि शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा व कंपन्याकडुन १०० टक्के वसुली करा..देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते.शेतकऱ्यांना ८ तास वीज देयची आणि १०० टक्के वीजबिले वसुली करायची कंपन्यांना पुर्ण वेळ विज देयची आणि त्यांच्या थकबाकीबाबत सरकारने गप्प बसायचे आणि शेतकऱ्यांना त्रास द्यायचा हे चुकीचे आहे.- भाऊसाहेब शंखपाळ, चेअरमन, कादवा पाणी वापर संस्था, कारसूळ.

(१६ पिंपळगाव बसवंत)

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी