शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित धाडसत्र योजना थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:36 IST

पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागामार्फत शेतकऱ्यांचे रोहीत्र विद्युतपंप आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र सुरू असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे धाडसत्र त्वरित थांबावा असे निवेदन शेतकरी वर्गाने पिंपळगाव महावीरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी उपअभियंता विशाखा गायकवाड यांना दिले आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन

पिंपळगाव बसवंत : महावितरण विभागामार्फत शेतकऱ्यांचे रोहीत्र विद्युतपंप आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडसत्र सुरू असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे धाडसत्र त्वरित थांबावा असे निवेदन शेतकरी वर्गाने पिंपळगाव महावीरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी उपअभियंता विशाखा गायकवाड यांना दिले आहे.सतत पाच ते सात वर्षांपासून अस्मानी, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून कोरोना सारख्या जनसंसर्ग रोगाने देशात थैमान घातले. या सर्व संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षाच्या संकटातून शेतकरी बाहेर येतोच नाही तर यावर्षी अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्यांचे द्राक्ष, गहु, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यात महावितरण विभाग व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भवती वीजपुरवठा खंडित करत धाडसत्र सुरु केले आहे. विजबिले भरले नाहीतर रोहित्र, विद्युतपंप व लाईट कट करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

सरकाने शेतकऱ्यासाठी ५० टक्के बिले भरून संपूर्ण वीज बिल माफीची योजना सुरू केली आहे. मात्र त्या योजनेची अध्यपही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्रास सुरु असलेली धाडसत्र योजना त्वरित थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था झुगारुन महावितरणच्या विरोधात रस्त्यावर यावे लागेल, असे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेयावेळी देवेंद्र काजळे, कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ, मधुकर ताकाटे, रमेश गायकावाड, मनोज मोरे, निवृत्ती ताकाटे, गणपत जगताप, अशोक मेधणे, बाळासाहेब जाधव, जालिंदर बनकर, वैभव केणे आदी उपस्थित होते.आसमानी संकटांनी व कोरोना वायरसमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे त्यात महावितरण विभाग व महाविकास आघाडी सरकारने जे धाडसत्र योजना सुरु केली आहे ती थांबवा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल म्हणुन शेतकऱ्याच्या गरजा व भावना लक्षात घ्या. आणि शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा व कंपन्याकडुन १०० टक्के वसुली करा..देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते.शेतकऱ्यांना ८ तास वीज देयची आणि १०० टक्के वीजबिले वसुली करायची कंपन्यांना पुर्ण वेळ विज देयची आणि त्यांच्या थकबाकीबाबत सरकारने गप्प बसायचे आणि शेतकऱ्यांना त्रास द्यायचा हे चुकीचे आहे.- भाऊसाहेब शंखपाळ, चेअरमन, कादवा पाणी वापर संस्था, कारसूळ.

(१६ पिंपळगाव बसवंत)

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी