शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

शेतकºयांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:29 IST

नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनामपूर : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर

नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.देशभरात शेतकºयांच्या सुमारे १३२ संघटनांनी एकत्र येऊन १ जूनपासून शेतमाल विक्रीवर बहिष्कार टाकून शेतकरी संप पुकारला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पगार यांच्या नेतृत्वाखाली नामपूरला बाजार समिती समोर रास्ता रोको करण्यात आले. याप्रसंगी पगार यांनी आपल्या भाषणातून सरकारवर टीका केली. सत्ताधारी भाजपा सरकार शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. खोट्या घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात आहे. येत्या दोन दिवसात जर शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दीपक पगार यांनी यावेळी दिल. याप्रसंगी प्रहार संघटनेचे नाना भाऊ सावंत, रा. कॉँचे शशिकांत कोर, सम्राट काकडे, नितीन काकडे , बी. एस. भामरे, शेतकरी संघटनेचे प्रवीण अहिरे, पंढरीनाथ अहिरे, समीर सावंत, भिका धोंडगे, विनोद पाटील, हेमंत कोर, डोंगर पगार, सचिन कापडनीस यांनी तीव्र शब्दात शासनाचा निषेध व्यक्त केला. भाजपा वगळता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी संपास पाठिंबा दिला आहे. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, दुधाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, नुकसानीचे पंचनामे झाल्यावर तत्काळ भरपाई मिळाली पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू करावा, चालू महिन्यात खरीप हंगामात पीककर्ज मिळाले पाहिजे, बँकांनी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक धिवरे, पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक विजय गावित , मंडल अधिकारी सी. पी. अहिरे यांना देण्यात आले. आंदोलन सुरु होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा व दंगानियंत्रण पथक नामपूर शहरात दाखल झाले होते. रास्ता रोकोमुळे सुमारे दोन तास मालेगाव-ताहाराबाद रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नामपूर परिसरातील शेतकºयांच्या भावनांचे निवेदन मिळाले असून, शासनस्तरावर लवकरच अहवाल पाठवून योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा.- दीपक धिवरेनायब तहसीलदार, सटाणा

पोलीस बंदोबस्तात दूध टॅँकर रवाना

लासलगाव : विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेल्याने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लासलगाव येथून पोलीस बंदोबस्तात दुधाचा टॅँकर रवाना करण्यात आला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात संकटात सापडलेल्या बळीराजाने विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील नागरिकांची रसद थांबविण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची कमतरता भासू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देऊ केल्याने त्याचा फायदा लासलगाव येथील एका दूध संकलन केंद्राच्या संचालकाने घेत पोलीस बंदोबस्तात वीस हजार लिटर दूध सुरत येथील डेअरीसाठी पाठवले. हे दूध डेअरीत पोहोचल्यानंतर पॅकिंग करून दूध मुंबईसाठी पाठविले जाणार आहे, अशी माहिती दूध संकलन केंद्राचे संचालक दत्ता क्षीरसागर यांनी दिली .