शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

थांब लक्ष्मी कुंकू लावते,

By admin | Updated: September 26, 2015 23:16 IST

येवल्याच्या पैठणीचा अहेर करते!

बाईसाहबाला शिवीन म्हटलं चोळीपन शिंप्याची बंद झाली आळीमी काय चोळीसिवन्याजोगी नव्हती व्हई?एकनाथी भारुडातली ही बाईसाब म्हणजे नणंद. नणंद म्हटलं की अत्यंत खाष्ट आणि कजाग बाई. किती खाष्ट आणि किती भांडकुदळ, तर‘नंदेचं कार्ट किरकीर करतंयखरुज होऊ दे त्यालाभवानी आई रोडगा व्हाईन तुला’पण सगळ्या नणंदा अशा खाष्ट नसतात आणि भावजयादेखील एकनाथांनी वर्णिल्याप्रमाणे डांबीस आणि लबाड नसतात. काही नणंदा म्हणजे मूर्तीमंत ‘आनंद’ आणि भावजया तर साक्षात ‘देव्याच’. देव दिनाघरी धावला असं काहीसं भगवंत आणि सुदाम्याविषयी म्हणतात म्हणे. पण इथे तर साक्षात आनंदमूर्तीच देवीघरी धावली. तीदेखील बहुधा नणंदेच्या रुपात आणि तेही माहेरपणाला. माहेरपणाला आलेल्या माहेरवासणीला दोन दिवस थांबवून घेणं, तिला गोडाधडाचं खाऊ घालणं आणि तिची सासरी पाठविताना खण-नारळ, चोळी-बांगडी किंवा जे काही ऐपतीत बसेल आणि परवडेल ते देऊन तिचा आदर सत्कार करणं देवीस्वरुप भावजयीचं कर्तव्य ठरतं. सगळ्याच नणंदा आणि साऱ्याच भावजया एकनाथांना गवसल्या तशा नसतात.पण भावजयी देवीस्वरुप झाली म्हणून काय झालं? ऐपतही रग्गड असली म्हणून काय झालं? परवडण्या बिरवड्याण्याचा प्रश्न नसला म्हणून काय झालं? अखेर भावजयी पडली बाईमाणूस. तिची तर नणंद माहेरपणाला आलेली. पण तिच्या भावांची तर साक्षात जिवाभावाची बहीण माहेरपणाला आलेली. मग त्यांचे काही कर्तव्य आहे की नाही?त्यातून ते सारे म्हणजे काही,निस्ती कळण्याची भाकर अन आंबाड्याची भाजीखाणारे नव्हत!एकसे एक सारे तालेवार. कुणी शेतसारा वसूल करणारे, कुणी चोरा-चिलटांचा बंदोबस्त करणारे, कुणी ब्यँकांचा बंदोबस्त करणारे, तर कुणी काय अन कुणी काय. खरं तर त्यानी साऱ्यानी आपणहून पुढे व्हायचं. बहिणीला काय हवं काय नको हे विचारायचं. बाई तुला माहेरची ईरकल हवी, येवल्याची पैठणी हवी, सराफाकडचा एखादा डाग हवा का आणखी काय हवं, हे नुसतं विचारायचं नाही, तर आणून तिच्या ओच्यात ओटी म्हणून टाकायचं. पण कसचं काय आन फाटक्यात पाय. पण म्हणतात ना, गुराख्यानं सोडलं म्हणजे मालकाला सोडून चालत नाही. लाज देवीस्वरुप भावजयीलाच वाटली. नणंदेचा आदर सत्कार करु, तिची चांगली पाठवणी करु म्हणजे ती तिच्या सासरी जाऊन आपलं कौतीक करील आणि उद्या तिच्याकडंच जायचं वेळ आली तर एक पाट सात ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, असा भला विचार करुन भावजयीनी आपल्या साऱ्या दिरांना कामाला लावलं. एकेकाला एकेक जिन्नस नेमून दिला. खनपटी बसून तो त्यांच्याकडून आणवून घेतला. पण तरीही ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’ म्हणणाऱ्या या बिलंदर भावांची कुरकर सुरुच. एकनाथांना जर हे समजलं असतं तर ते लगेच म्हणाले असते,नंदेची भाचरं कुरकुर करत्यातपटकी होऊं दे त्यानाआनंदीबाई पैठणी नेसवीन तुला