शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

थांब लक्ष्मी कुंकू लावते,

By admin | Updated: September 26, 2015 23:16 IST

येवल्याच्या पैठणीचा अहेर करते!

बाईसाहबाला शिवीन म्हटलं चोळीपन शिंप्याची बंद झाली आळीमी काय चोळीसिवन्याजोगी नव्हती व्हई?एकनाथी भारुडातली ही बाईसाब म्हणजे नणंद. नणंद म्हटलं की अत्यंत खाष्ट आणि कजाग बाई. किती खाष्ट आणि किती भांडकुदळ, तर‘नंदेचं कार्ट किरकीर करतंयखरुज होऊ दे त्यालाभवानी आई रोडगा व्हाईन तुला’पण सगळ्या नणंदा अशा खाष्ट नसतात आणि भावजयादेखील एकनाथांनी वर्णिल्याप्रमाणे डांबीस आणि लबाड नसतात. काही नणंदा म्हणजे मूर्तीमंत ‘आनंद’ आणि भावजया तर साक्षात ‘देव्याच’. देव दिनाघरी धावला असं काहीसं भगवंत आणि सुदाम्याविषयी म्हणतात म्हणे. पण इथे तर साक्षात आनंदमूर्तीच देवीघरी धावली. तीदेखील बहुधा नणंदेच्या रुपात आणि तेही माहेरपणाला. माहेरपणाला आलेल्या माहेरवासणीला दोन दिवस थांबवून घेणं, तिला गोडाधडाचं खाऊ घालणं आणि तिची सासरी पाठविताना खण-नारळ, चोळी-बांगडी किंवा जे काही ऐपतीत बसेल आणि परवडेल ते देऊन तिचा आदर सत्कार करणं देवीस्वरुप भावजयीचं कर्तव्य ठरतं. सगळ्याच नणंदा आणि साऱ्याच भावजया एकनाथांना गवसल्या तशा नसतात.पण भावजयी देवीस्वरुप झाली म्हणून काय झालं? ऐपतही रग्गड असली म्हणून काय झालं? परवडण्या बिरवड्याण्याचा प्रश्न नसला म्हणून काय झालं? अखेर भावजयी पडली बाईमाणूस. तिची तर नणंद माहेरपणाला आलेली. पण तिच्या भावांची तर साक्षात जिवाभावाची बहीण माहेरपणाला आलेली. मग त्यांचे काही कर्तव्य आहे की नाही?त्यातून ते सारे म्हणजे काही,निस्ती कळण्याची भाकर अन आंबाड्याची भाजीखाणारे नव्हत!एकसे एक सारे तालेवार. कुणी शेतसारा वसूल करणारे, कुणी चोरा-चिलटांचा बंदोबस्त करणारे, कुणी ब्यँकांचा बंदोबस्त करणारे, तर कुणी काय अन कुणी काय. खरं तर त्यानी साऱ्यानी आपणहून पुढे व्हायचं. बहिणीला काय हवं काय नको हे विचारायचं. बाई तुला माहेरची ईरकल हवी, येवल्याची पैठणी हवी, सराफाकडचा एखादा डाग हवा का आणखी काय हवं, हे नुसतं विचारायचं नाही, तर आणून तिच्या ओच्यात ओटी म्हणून टाकायचं. पण कसचं काय आन फाटक्यात पाय. पण म्हणतात ना, गुराख्यानं सोडलं म्हणजे मालकाला सोडून चालत नाही. लाज देवीस्वरुप भावजयीलाच वाटली. नणंदेचा आदर सत्कार करु, तिची चांगली पाठवणी करु म्हणजे ती तिच्या सासरी जाऊन आपलं कौतीक करील आणि उद्या तिच्याकडंच जायचं वेळ आली तर एक पाट सात ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, असा भला विचार करुन भावजयीनी आपल्या साऱ्या दिरांना कामाला लावलं. एकेकाला एकेक जिन्नस नेमून दिला. खनपटी बसून तो त्यांच्याकडून आणवून घेतला. पण तरीही ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’ म्हणणाऱ्या या बिलंदर भावांची कुरकर सुरुच. एकनाथांना जर हे समजलं असतं तर ते लगेच म्हणाले असते,नंदेची भाचरं कुरकुर करत्यातपटकी होऊं दे त्यानाआनंदीबाई पैठणी नेसवीन तुला