शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

येवला तालुका दुष्काळी जाहिर करून सक्तीची वसुली थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:51 IST

येवला : येवला तालुक्यात पावसाळ्यात एकही जोराचा पाऊस झाला नाही. भरपावसाळ्यात विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पावसाच्या भरवशावर मका, सोयाबीन, बाजरी, कांदा यासारखी रब्बीची पिके उभी केली. बॅन्क आणि सोसायटीकडून कर्ज उपलब्ध होत नसताना उधार उसनवार, किंवा सावकारी कर्ज घेऊन पिकासाठी खर्च केला. मात्र योग्य असा पाऊस न पडल्याने पिक करपुन गेली. काही ठिकाणी फक्त चारा होईल, जेमतेम पाटाखालील काही भागात वीसपंचवीस टक्के खरिप पिक हातात येण्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटनचे निवेदन : रोहित्र बंद करण्याची मोहीमेमुळे आक्रमक

येवला : येवला तालुक्यात पावसाळ्यात एकही जोराचा पाऊस झाला नाही. भरपावसाळ्यात विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून पावसाच्या भरवशावर मका, सोयाबीन, बाजरी, कांदा यासारखी रब्बीची पिके उभी केली. बॅन्क आणि सोसायटीकडून कर्ज उपलब्ध होत नसताना उधार उसनवार, किंवा सावकारी कर्ज घेऊन पिकासाठी खर्च केला. मात्र योग्य असा पाऊस न पडल्याने पिक करपुन गेली. काही ठिकाणी फक्त चारा होईल, जेमतेम पाटाखालील काही भागात वीसपंचवीस टक्के खरिप पिक हातात येण्याची स्थिती आहे.शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिकासाठी भरमसाठ खर्च करून भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला तरी मायबाप सरकार मुग गिळून गप्प बसले असल्याचे शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.पावसाळ्यात येवले तालुक्यात २९ गाव आणि १९ वाड्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालु आहेत. पालखेड डाव्या कालव्यावरील ओव्हर फ्लोच्या रोटेशनमुळे पंधरा वीस टक्के भागात नदीवरील बंधारे भरून दिले असले तरी ते पाणी एक महिन्याच्यावर पिकांना जीवदान देऊ शकत नाहीत.शेतकºयांच्या वस्तीवर पिण्यासाठी व जनावरांसाठी बोअरवेल शिवाय पाण्याची सोय नाही. मात्र विज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याची मोहीम हाती घेऊन शेतकºयांना जगणे मुश्किल केले आहे. या मोहिमेविरोधात शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे निवेदन मंगळवारी शेतकरी संघटनेने येवला उप विभागीय अधिकारी दराडे, तहसिलदार वारूळे, आमदार छगन भूजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे तसेच भाजप तालुका अध्यक्ष, भाजपा शहराध्यक्ष यांना देण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. दुष्काळाच्या सुविधा तालुक्यातील जनतेला मिळवून द्याव्यात. बील वसुली, बॅन्केची कर्ज वसुली त्वरित थांबवा, कांद्याला किमान दोन हजार भाव जाहीर करून शेतकºयांने विकलेल्या कांद्याची फरकाची रक्कम त्याच्या खात्यात जमा करावी, टोमॅटोसाठी पाकिस्तान, बांगलादेश बॉर्डर खूली करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या देशात त्यांचा कांदा,साखर, आंबा येऊ शकतो मग आपले टोमॅटो का पाठवत नाही? कांदा पिकाला उत्पादन खर्चावर अधारित रास्त भाव मिळण्यासाठी आयात निर्यात धोरणात सातत्य राखून नविन बाजार शोधून संबंधित देशांशी करार करावे, कायद्याला किमान दोन हजार रु पये क्विंटल भाव द्यावा आदी मागण्या आहेत.शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, तालुकाध्यक्ष अरूण जाधव, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश सोमवंशी, बापूसाहेब पगारे, जाफर पठाण, बाळासाहेब गायकवाड, अनिस पटेल, सुभाष सोनवणे, शंकर पुरकर, दत्तात्रय मोगल, दत्तु सादडे, सुरेश जेजूरकर, भगवान बोराडे, सतिश जगझाप, जयराम वर्पे, वसंत पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक