शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सटाण्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:40 IST

सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत एक तास वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात शिवसेनेने सहभागी होऊन रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि कांदा ओतून सरकारचा धिक्कार केला.

ठळक मुद्देदूध, कांदा फेकला रस्त्यावर : वाहतूक ठप्प; शासनाविरोधात घोषणाबाजी

सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत एक तास वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात शिवसेनेने सहभागी होऊन रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि कांदा ओतून सरकारचा धिक्कार केला.गेल्या दोन दिवसापासून शेतकºयांनी देशव्यापी संप पुकारला आहे. भाजीपाला, कांदा, दूध आणि धान्य विक्री व वाहतुकीला संपकरी शेतकºयांनी मज्जाव केला आहे. आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी बागलाण तालुक्यातील शेतकºयांनी मोरेनगर जवळ एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. संतप्त महिला शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदा फेकून देत निषेध व्यक्त केला.शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे यांनीदेखील आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. जिल्हा उपप्रमुख सोनवणे यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे. शेतकºयाला मातीमोल भावाने ैआपला शेतमाल विकावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा यांना मागण्यांचे निवेदन सादर करून शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शेतकरी संघाचे सभापती प्रल्हाद पाटील, प्रवीण बळीराम सोनवणे, दोधा मोरे, सरपंच सुरेश जाधव, कैलास बोरसे, बाळासाहेब देवरे, बाळासाहेब मोरे, भरत अहिरे, सुरेश अहिरे, मुरलीधर खैरनार, मधुकर देवरे, दºहाणेचे सरपंच परशराम पाकळे, मुरलीधर खैरनार, रवींद्र वाघ, रवींद्र अहिरे, प्रकाश मोरे, धर्मेंद्र बागुल, सुनील मोरे यांच्यासह महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.वारंवार होणारा अवकाळी पाऊस, ,गारपीट या अस्मानी संकटाला तोंड देत कष्टाने शेतमाल पिकवतो. मात्र तोच माल मातीमोल भावाने विकावा लागत आहे. यामुळे शेतकºयाच्या पदरात उत्पादन खर्चदेखील पडत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होऊन नैराश्यातून तो मृत्यूला कवटाळत आहे. सरकारने शेतकºयांना आणि शेती व्यवसायाला वाचवण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे..