शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
3
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
4
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
5
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
6
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
7
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
8
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
9
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
10
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
11
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
12
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
13
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
14
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
15
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
16
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
17
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
18
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
19
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

सटाण्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:40 IST

सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत एक तास वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात शिवसेनेने सहभागी होऊन रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि कांदा ओतून सरकारचा धिक्कार केला.

ठळक मुद्देदूध, कांदा फेकला रस्त्यावर : वाहतूक ठप्प; शासनाविरोधात घोषणाबाजी

सटाणा : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी व शेतकºयांचा सातबारा उतारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी शनिवारी (दि.२) दुपारी दीडशे ते दोनशे शेतकरी व महिला शेतकºयांनी मोरेनगर जवळून जाणाºया साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत एक तास वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात शिवसेनेने सहभागी होऊन रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि कांदा ओतून सरकारचा धिक्कार केला.गेल्या दोन दिवसापासून शेतकºयांनी देशव्यापी संप पुकारला आहे. भाजीपाला, कांदा, दूध आणि धान्य विक्री व वाहतुकीला संपकरी शेतकºयांनी मज्जाव केला आहे. आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी बागलाण तालुक्यातील शेतकºयांनी मोरेनगर जवळ एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. संतप्त महिला शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदा फेकून देत निषेध व्यक्त केला.शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे यांनीदेखील आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. जिल्हा उपप्रमुख सोनवणे यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे. शेतकºयाला मातीमोल भावाने ैआपला शेतमाल विकावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा यांना मागण्यांचे निवेदन सादर करून शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात शेतकरी संघाचे सभापती प्रल्हाद पाटील, प्रवीण बळीराम सोनवणे, दोधा मोरे, सरपंच सुरेश जाधव, कैलास बोरसे, बाळासाहेब देवरे, बाळासाहेब मोरे, भरत अहिरे, सुरेश अहिरे, मुरलीधर खैरनार, मधुकर देवरे, दºहाणेचे सरपंच परशराम पाकळे, मुरलीधर खैरनार, रवींद्र वाघ, रवींद्र अहिरे, प्रकाश मोरे, धर्मेंद्र बागुल, सुनील मोरे यांच्यासह महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.वारंवार होणारा अवकाळी पाऊस, ,गारपीट या अस्मानी संकटाला तोंड देत कष्टाने शेतमाल पिकवतो. मात्र तोच माल मातीमोल भावाने विकावा लागत आहे. यामुळे शेतकºयाच्या पदरात उत्पादन खर्चदेखील पडत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होऊन नैराश्यातून तो मृत्यूला कवटाळत आहे. सरकारने शेतकºयांना आणि शेती व्यवसायाला वाचवण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे..