शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दिंडोरीत रास्ता रोको

By admin | Updated: September 16, 2015 00:01 IST

आंदोलन : नाशिक-कळवण महामार्गावरील वाहतूक ठप्प

दिंडोरी : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीने जेलभरो आंदोलन केले असून, सरकारने त्वरित निर्णय घेत संपूर्ण कर्जमाफीसह तत्काळ दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कादवाचे अध्यक्ष तथा साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केली आहे.मंगळवारी (दि.१५) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिंडोरी येथे कादवा कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता नाशिक-कळवण महामार्गावर सुमारे दीडतास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सुमारे ८००हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली व सुटका केली.यावेळी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन करताना श्रीराम शेटे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि सरकारने केलेले दुर्लक्ष अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्त्या करणार नाही तर काय करतील, असा जळजळीत सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला. तसेच आत्महत्त्या हा पर्याय नाही तेव्हा थोडं सबुरीनं घ्या, असा सल्लादेखील त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. कृउबाचे सभापती दत्तात्रय पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे दिंडोरी रायुकाँ तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, विश्वासराव देशमुख, आनंद चौधरी, शोभा मगर, शेतकरी नेते भास्कर गोडसे, रघुनाथ पाटील आदिंनी आंदोलकाना मार्गदर्शन केले.यावेळी दुपारी दीडच्या पोलिसांनी दोन वाहनांतून नेत्यांना अटक केली, तर काही कार्यकर्त्यांनी स्वत: अटक करवून घेतली. अ‍ॅड. दीपक बलकवडे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, शोभा मगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दत्तात्रय पाटील, विश्वास देशमुख अनिल देशमुख, कैलास मवाळ, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, संगीता राऊत, अलका चौधरी, विलास कड, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, रामदास पिंगळ, त्र्यंबक संधान, सचिन देशमुख, श्याम हिरे, संपत कड, भास्कर गोडसे, विश्वास देशमुख आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)