शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

दगडफेकीची घटना : तणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली अतिक्रमण मोहिमेला गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:32 IST

नाशिक : महापालिकेमार्फत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला गुरुवारी (दि.१६) जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नानावली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात झाल्याने पथकावर दगडफेक करण्यात आली. व परिसरातील विद्युतप्रवाहही खंडीत करण्यात आला. त्यामुळे संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीतच महापालिकेच्या पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही रात्री १० वाजता पूर्ण केली.

ठळक मुद्देतणावपूर्ण स्थितीत जुन्या नाशकातील धार्मिक स्थळे हटवली नाशिक : अतिक्रमण मोहिमेला गालबोट

अतिक्रमण पथकावर दगडफेक करणाºया जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर नानावली परिसरात शांतता पसरली. जमावाच्या धावपळीत रस्त्यावर चपला आणि दगड पडलेले होते. 

नाशिक : महापालिकेमार्फत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाईला गुरुवारी (दि.१६) जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नानावली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात झाल्याने पथकावर दगडफेक करण्यात आली. व परिसरातील विद्युतप्रवाहही खंडीत करण्यात आला. त्यामुळे संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तणावपूर्ण स्थितीतच महापालिकेच्या पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही रात्री १० वाजता पूर्ण केली.न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने दि. ८ नोव्हेंबरपासून रस्त्यांवर अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. सिडको, सातपूर, पश्चिम आणि पंचवटी विभागातील सुमारे दीडशे अनधिकृत धार्मिक स्थळे किरकोळ विरोध वगळता शांततेच्या वातावरणात जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, पूर्व विभागातील सात अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधी संबंधित विश्वस्तांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली गेल्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.१६) सदर अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेने मुंबई नाका परिसरातील धार्मिक स्थळापासून कारवाईला प्रारंभ केला. त्यानंतर संवेदनशील समजल्या जाणाºया भारतनगरमधील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम परिसरातील तरुणांनी स्वत:हून काढून घेतले.महापालिकेचे पथक पोहोचेपर्यंत निम्म्याहून अधिक बांधकाम काढून घेण्यात आले होते. धार्मिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी सामंजस्याची भूमिका बजावली.तासाभरात परिस्थिती नियंत्रणात नानावलीमधील धार्मिक स्थळाच्या आवारात महिला भाविकांनी ठिय्या देत विरोध दर्शविल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास येथील धार्मिक स्थळ हटविण्यासाठी अतिक्रमण पथक दाखल होताच महिलांनी आक्रोश सुरू केला. त्यामुळे वातावरण तापल्याने जमावाला शांत करण्यासाठी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना आसिफ इकबाल, मीर मुख्तार अशरफी यांनी ध्वनिक्षेपकांवरुन आवाहन सुरू केल. मात्र काही समाजकंटकांनी पथकावर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांचा पुरेसा फौजफाटा असल्याने अवघ्या तासाभरात परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.धर्मगुरूंकडून जमावाचे प्रबोधनमहापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर भारतनगर परिसरात काहीकाळ तणावाची स्थिती होती. यावेळी धर्मगुरूंनी घटनास्थळी जाऊन जमलेल्या जमावाला कायदा आणि न्यायालयाचा आदेश समजावून सांगितला आणि त्यांचे प्रबोधनही केले. जुन्या नाशकातील नानावली परिसरातही तणावाची स्थिती बनल्याने धर्मगुरूंनी उपस्थित जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या जमावात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश होता.दोन पोलीस कर्मचाºयांसहएकजण जखमीनानावलीचे धार्मिक स्थळ हटविताना झालेल्या दगडफेकीत एका पोलीस अधिकाºयासह कर्मचारी व एक नागरिक जखमी झाले आहेत. दोन पोलीस वाहनांसह अग्निशामक दलाच्या वाहनाचीही काच फुटली. जखमींना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. दंगल नियंत्रण पथकाने जमावावर लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी जमावाने पळ काढतरस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी पाडून देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तणावपूर्ण वातावरणात कार्यवाही पार पडली.नानावलीत दगडफेकीमुळे काहीकाळ तणाव न्यायालयाने याचिका फेटाळल्याने ‘त्या’ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध पालिकेने गुरूवारी मोहीम हाती घेतली. सकाळी मोहिमेला शांततेत सुरूवात झाली; मात्र नानावली भागात दगडफेकीमुळे गालबोट लागले. सकाळपासून धर्मगुरूंकडून शांततेचे आवाहन केले जात होते. त्यामुळे सहाही धार्मिक स्थळांवरील कार्यवाही शांततेत पूर्ण झाली. बहुतांश भागात स्थानिकांनी पुढाकार घेत धार्मिक स्थळांचे बांधकाम काढून घेतले; मात्र अखेरचे सातवे धार्मिक स्थळ हटविताना दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.