शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

अजूनही परिस्थिती जैसे थे प्रश्न

By admin | Updated: August 6, 2016 00:48 IST

आरोग्याचा : तातडीने सफाई न झाल्यास साथीचे रोग बळावण्याची भीती

नाशिक : सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून अजूनही शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी (दि. ४) पावसाने विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी मात्र पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. शहरातील पंचवटी, सराफ बाजार, भांडी बाजार, गोदापार्क या परिसराचे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही व्यावसायिकांचे जीवन पूर्वपदावर न आल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले.सराफ बाजारातील काही सराफांनी व्यवसायाला सुरुवात केली असली तरी दुकानांतील शोकेसमध्ये दागिने लावण्यात आलेले नाहीत, ग्राहकांचाही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने छोट्या प्रमाणातच सराफ व्यावसायिक व्यवसाय करताना दिसत होते. अनेक सराफ दुकानांमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या फर्निचरची योग्य मांडणी सुरू होती तर काही दुकानांमध्ये पाण्याच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम शुक्रवारीही दिसत होते. दुकानदार आपल्या दुकानांमध्ये स्वच्छता करीत असले तरी दुकानातील गाळ तसेच साचलेला कचरा दुकाना बाहेर फेकत असल्याने या परिसराला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सराफ बाजारातील रस्ते अरूंद असल्याने याठिकाणी जेसीबी किंवा तत्सम उपकरणांच्या साहाय्याने स्वच्छता करणे शक्य होत नसल्याने व्यावसायिकच याठिकाणी स्वच्छता करत आहेत.सराफ बाजारापेक्षाही भांडीबाजार परिसराची वाईट अवस्था झाली असून अजूनही येथे गाळ तसाच साचला आहे. भांडी बाजारातील अनेक दुकानांमध्ये दुकानातील गाळ उपसण्याचे आणि दुकानातील भांडी स्वच्छ करण्याचे काम सुरूच आहे. या परिसरात कापड व्यावसायिकांची- देखील दुकाने असून पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या कपड्यांचा खच दुकानांबाहेर पडल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. पुराच्या पाण्यामुळे दुकानातील वस्तू खराब झाल्याने व्यावसायिकांकडून खराब झालेल्या वस्तूंची स्वस्तात विक्री सुरू असल्याने या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजा तसेच पुढील महिन्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून पूजेसाठी लागणारी भांडी, इतर उपकरणे यासह चौरंगाची खरेदी करताना ग्राहक दिसत होते. भांडी बाजारात टपऱ्या वाहून आल्याने तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांना अरूंद वाटेतून चालणे मुश्कील झाले आहे. पोटरीपर्यंत साचलेल्या गाळातून कशीबशी वाट काढताना नागरिक दिसत होते. याठिकाणीही प्लॅस्टिक, पुठ्ठे आदि कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने स्वच्छता होणे आवश्यक असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.