शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

अंगणवाडी कर्मचाºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:03 IST

सटाणा : महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे सचिव राजेश सिंह, सरचिटणीस ब्रिजपाल सिंह व तालुकाध्यक्षा रजनी कुलकर्णी यांनी केले. गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देसटाणा पंचायत समितीवर मोर्चा : आंदोलन व्यापक करण्याचा निर्धार

सटाणा : महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे सचिव राजेश सिंह, सरचिटणीस ब्रिजपाल सिंह व तालुकाध्यक्षा रजनी कुलकर्णी यांनी केले. गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.तालुक्यातील सर्व अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर येथे एकत्र येऊन मोर्चाची सुरुवात केली. मोर्चात महिला व बालविकास कल्याण विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पंचायत समिती कार्यालयात येताच त्यांनी ठिय्या दिला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी घोषणा देण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा राजश्री पानसरे, माधुरी पवार, जिजाबाई अहिरराव, कुसुम खैरनार, चंद्रकलाबाई बेडसे, गायत्री देसले, मनीषा कापडणीस, शालिनी मोरे, मंदाकिनी राजधर, हिराबाई ठाकरे, माया भामरे, सुनंदा बच्छाव, रंजना मगरे, वर्षा भामरे, रूपाली खरे, छाया भामरे, अनिता शेवाळे, केदाबाई अहिरे, ललिता सोनवणे, सुशीला अहिरे, कलावती देवरे आदींसह तालुक्यातील सेविका, मदतनीस कार्यकर्त्या उपस्थित होत्या.विविध मागण्यांचे निवेदन निवेदनात म्हटले आहे की, २५ पेक्षा कमी मुले असतील तर ते अंगणवाडी केंद्र बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रात समाविष्ट करण्यासंदर्भात काढण्यात आलेला आदेश त्वरित रद्द करावा, अब्दुल कलाम योजनेची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी तसेच अंडी व केळीचे पैसेही तातडीने देण्यात यावे, मानधन न मिळालेल्या कर्मचाºयांना थकीत रक्कम देण्यात यावी, लाइन लिस्टिंगच्या व बालआधार नोंदणीच्या कामाची सक्ती बंद करावी आदींसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.