शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

भाविकांचा मुक्काम; तिसऱ्या पर्वणीची आस

By admin | Updated: September 14, 2015 23:25 IST

उत्साह : साधुग्राम अद्याप गजबजलेलेच

नाशिक : दुसऱ्या शाही पर्वणीनंतर परराज्यातील भाविकांनी साधुग्राम परिसरातच जागा मिळेल तेथे मुक्काम ठोकल्याने सर्वत्र गजबजाट दिसत असून, तीन दिवसांवर येऊन ठेपलेले तिसरे शाहीस्नान केल्यानंतरच आम्ही येथून जाणार असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. त्यामुळे साधुग्रामला यात्रेचे स्वरूप आले असून, सर्वच आखाडे आणि खालशांमध्ये मोठी गर्दी वाढल्याने पोलीस यंत्रणेवरदेखील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, साधूंची संख्यादेखील वाढलेली दिसते.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नान पर्वणीला पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेच्या कडक बंदोबस्ताची आडकाठी आणि कठोर नियमावलीमुळे राज्यातील, तसेच परराज्यातील भाविक येऊ न शकल्यामुळे मोठा गहजब उडाल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाने दुसऱ्या शाही पर्वणीच्या स्नानासाठी ढिल देत बंदोबस्त सैल केल्याने रविवारी गोदाघाटावर स्नानासाठी लाखो भाविकांचा जनसागर उसळला होता. यात बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आदि राज्यांतील भाविकांची संख्या लक्षणीय होती. या भाविकांनी दुसऱ्या शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी साधुग्राममधील आपापल्या प्रांतातील, तसेच जिल्ह्यातील खालशांमध्ये मुक्काम ठोकला होता. तसेच काही भाविकांनी आपल्या ओळखीच्या महाराजांचे आखाडे व खालशांमध्ये चार दिवसांच्या निवाऱ्याची सोय लावून घेतली आहे. वास्तविक पाहता आखाडे व खालशांचे तंबू उभारल्यापासून ते पहिली शाही पर्वणी संपल्यानंतरदेखील या ठिकाणी निवासासाठी उभारलेल्या खोल्या, छोटे तंबू आणि कुटिया काही प्रमाणात रिकामेच दिसत होते. सेक्टर एक व दोनमध्ये थोडीफार गर्दी दिसत असली तरी सेक्टर तीन, चारमध्ये तुरळक गर्दी होती. परंतु दुसऱ्या पर्वणीची चाहूल लागल्यापासून साधुग्राममध्ये सर्व सेक्टरमध्ये भाविक, तसेच साधूंची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्यामुळे सर्वच खालशांचे तंबू फुल्ल झाले आहेत. निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तिन्ही मुख्य आखाड्यांनी उभारलेल्या विशाल डोममध्येदेखील साधूंसह भाविकांनी आपल्या पथाऱ्या पसरविलेल्या आहेत. साधुग्राममधील पदपथावर झाडाखाली आणि ओट्यांवरही भाविक आराम करीत असल्याने पाय ठेवायला जागा नाही. (प्रतिनिधी)

अन्नछत्रात गर्दीअन्नछत्रामध्येदेखील भोजनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर दुसरीकडे भजन, कीर्तनाच्या मंडपांत भाविक सत्संगासाठी बसलेले दिसतात. मोठय़ा महंतांच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळ, सायंकाळ रांगा लागलेल्या दिसतात. वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य केंद्र व दवाखान्यांमध्ये गर्दी आहे.