शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

भाविकांचा मुक्काम; तिसऱ्या पर्वणीची आस

By admin | Updated: September 14, 2015 23:25 IST

उत्साह : साधुग्राम अद्याप गजबजलेलेच

नाशिक : दुसऱ्या शाही पर्वणीनंतर परराज्यातील भाविकांनी साधुग्राम परिसरातच जागा मिळेल तेथे मुक्काम ठोकल्याने सर्वत्र गजबजाट दिसत असून, तीन दिवसांवर येऊन ठेपलेले तिसरे शाहीस्नान केल्यानंतरच आम्ही येथून जाणार असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. त्यामुळे साधुग्रामला यात्रेचे स्वरूप आले असून, सर्वच आखाडे आणि खालशांमध्ये मोठी गर्दी वाढल्याने पोलीस यंत्रणेवरदेखील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, साधूंची संख्यादेखील वाढलेली दिसते.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नान पर्वणीला पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेच्या कडक बंदोबस्ताची आडकाठी आणि कठोर नियमावलीमुळे राज्यातील, तसेच परराज्यातील भाविक येऊ न शकल्यामुळे मोठा गहजब उडाल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाने दुसऱ्या शाही पर्वणीच्या स्नानासाठी ढिल देत बंदोबस्त सैल केल्याने रविवारी गोदाघाटावर स्नानासाठी लाखो भाविकांचा जनसागर उसळला होता. यात बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आदि राज्यांतील भाविकांची संख्या लक्षणीय होती. या भाविकांनी दुसऱ्या शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी साधुग्राममधील आपापल्या प्रांतातील, तसेच जिल्ह्यातील खालशांमध्ये मुक्काम ठोकला होता. तसेच काही भाविकांनी आपल्या ओळखीच्या महाराजांचे आखाडे व खालशांमध्ये चार दिवसांच्या निवाऱ्याची सोय लावून घेतली आहे. वास्तविक पाहता आखाडे व खालशांचे तंबू उभारल्यापासून ते पहिली शाही पर्वणी संपल्यानंतरदेखील या ठिकाणी निवासासाठी उभारलेल्या खोल्या, छोटे तंबू आणि कुटिया काही प्रमाणात रिकामेच दिसत होते. सेक्टर एक व दोनमध्ये थोडीफार गर्दी दिसत असली तरी सेक्टर तीन, चारमध्ये तुरळक गर्दी होती. परंतु दुसऱ्या पर्वणीची चाहूल लागल्यापासून साधुग्राममध्ये सर्व सेक्टरमध्ये भाविक, तसेच साधूंची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्यामुळे सर्वच खालशांचे तंबू फुल्ल झाले आहेत. निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तिन्ही मुख्य आखाड्यांनी उभारलेल्या विशाल डोममध्येदेखील साधूंसह भाविकांनी आपल्या पथाऱ्या पसरविलेल्या आहेत. साधुग्राममधील पदपथावर झाडाखाली आणि ओट्यांवरही भाविक आराम करीत असल्याने पाय ठेवायला जागा नाही. (प्रतिनिधी)

अन्नछत्रात गर्दीअन्नछत्रामध्येदेखील भोजनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर दुसरीकडे भजन, कीर्तनाच्या मंडपांत भाविक सत्संगासाठी बसलेले दिसतात. मोठय़ा महंतांच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळ, सायंकाळ रांगा लागलेल्या दिसतात. वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य केंद्र व दवाखान्यांमध्ये गर्दी आहे.