शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांचा मुक्काम; तिसऱ्या पर्वणीची आस

By admin | Updated: September 14, 2015 23:25 IST

उत्साह : साधुग्राम अद्याप गजबजलेलेच

नाशिक : दुसऱ्या शाही पर्वणीनंतर परराज्यातील भाविकांनी साधुग्राम परिसरातच जागा मिळेल तेथे मुक्काम ठोकल्याने सर्वत्र गजबजाट दिसत असून, तीन दिवसांवर येऊन ठेपलेले तिसरे शाहीस्नान केल्यानंतरच आम्ही येथून जाणार असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. त्यामुळे साधुग्रामला यात्रेचे स्वरूप आले असून, सर्वच आखाडे आणि खालशांमध्ये मोठी गर्दी वाढल्याने पोलीस यंत्रणेवरदेखील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, साधूंची संख्यादेखील वाढलेली दिसते.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नान पर्वणीला पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेच्या कडक बंदोबस्ताची आडकाठी आणि कठोर नियमावलीमुळे राज्यातील, तसेच परराज्यातील भाविक येऊ न शकल्यामुळे मोठा गहजब उडाल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाने दुसऱ्या शाही पर्वणीच्या स्नानासाठी ढिल देत बंदोबस्त सैल केल्याने रविवारी गोदाघाटावर स्नानासाठी लाखो भाविकांचा जनसागर उसळला होता. यात बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आदि राज्यांतील भाविकांची संख्या लक्षणीय होती. या भाविकांनी दुसऱ्या शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी साधुग्राममधील आपापल्या प्रांतातील, तसेच जिल्ह्यातील खालशांमध्ये मुक्काम ठोकला होता. तसेच काही भाविकांनी आपल्या ओळखीच्या महाराजांचे आखाडे व खालशांमध्ये चार दिवसांच्या निवाऱ्याची सोय लावून घेतली आहे. वास्तविक पाहता आखाडे व खालशांचे तंबू उभारल्यापासून ते पहिली शाही पर्वणी संपल्यानंतरदेखील या ठिकाणी निवासासाठी उभारलेल्या खोल्या, छोटे तंबू आणि कुटिया काही प्रमाणात रिकामेच दिसत होते. सेक्टर एक व दोनमध्ये थोडीफार गर्दी दिसत असली तरी सेक्टर तीन, चारमध्ये तुरळक गर्दी होती. परंतु दुसऱ्या पर्वणीची चाहूल लागल्यापासून साधुग्राममध्ये सर्व सेक्टरमध्ये भाविक, तसेच साधूंची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्यामुळे सर्वच खालशांचे तंबू फुल्ल झाले आहेत. निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तिन्ही मुख्य आखाड्यांनी उभारलेल्या विशाल डोममध्येदेखील साधूंसह भाविकांनी आपल्या पथाऱ्या पसरविलेल्या आहेत. साधुग्राममधील पदपथावर झाडाखाली आणि ओट्यांवरही भाविक आराम करीत असल्याने पाय ठेवायला जागा नाही. (प्रतिनिधी)

अन्नछत्रात गर्दीअन्नछत्रामध्येदेखील भोजनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर दुसरीकडे भजन, कीर्तनाच्या मंडपांत भाविक सत्संगासाठी बसलेले दिसतात. मोठय़ा महंतांच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळ, सायंकाळ रांगा लागलेल्या दिसतात. वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य केंद्र व दवाखान्यांमध्ये गर्दी आहे.