शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जीव धोक्यात घालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:52 IST

पायरपाडा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पळसन गावाकडे जाण्यासाठी नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे.

पळसन जवळील सातशे लोकसंख्या असलेले पायरपाडा हे गाव अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालून पुरात नार नदी ओलांडून जावे लागत आहे. हा प्रकार दर पावसाळ्यात दिसून येतो. त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. पळसन व पायरपाडा दरम्यान कोणताही पूल नसल्याने पावसाळ्यात ही गंभीर समस्या निर्माण होते. याबाबत जूनीमागणी असूनही दूर्लक्ष झाले आहे. पावसाळा सुरू झाला की, हा जीवघेणा खेळ सुरू होतो. लोकप्रतिनिधींपर्यंत आवाज पोहचत नाही हे मोठे दुर्भाग्य असल्याची जनभावना आहे. पावसाळा संपेपर्यंत काही नागरिक पळसनमध्ये ओळखीच्या ठिकाणी दूचाकी वाहने ठेवतात. म्हणजे नार नदी ओलांडून पळसनला यायचे, तेथून दूचाकी किंवा अन्य वाहनाने तालुक्याला यायचे. कामे उरकून पळसनला परत जावून संध्याकाळी पुन्हा नदीपात्र ओलांडून पायरपाड्याला जायचे. पावसाळा संपून जेव्हा नदीपात्र कोरडे होते, त्यावेळी उर्वरित आठ - नऊ महिने या नार नदीच्या कोरड्या पात्रातून वाहने ये - जा करतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर तिला दवाखान्यात नेता येत नाही. एखादा खूपच आजारी पडल्यावर पोहणाऱ्याला शोधून नार नदी पार करून द्या अशी विनंती करावी लागते. पुराच्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. रु ग्णांना डोली करून आणणेही कठीण झाले आहे.नार नदी पात्रातून चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जावे यावे लागते. नागरिकांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. स्वातंत्र्य काळापासून पायरपाडा गावाची अशीच परिस्थिती आहे. मोठ्या पूलाची मागणी लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली मात्र दुर्लक्ष होत आहे.- सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पळसन.

टॅग्स :floodपूरriverनदी