शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:52 IST

पायरपाडा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पळसन गावाकडे जाण्यासाठी नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे.

पळसन जवळील सातशे लोकसंख्या असलेले पायरपाडा हे गाव अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालून पुरात नार नदी ओलांडून जावे लागत आहे. हा प्रकार दर पावसाळ्यात दिसून येतो. त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. पळसन व पायरपाडा दरम्यान कोणताही पूल नसल्याने पावसाळ्यात ही गंभीर समस्या निर्माण होते. याबाबत जूनीमागणी असूनही दूर्लक्ष झाले आहे. पावसाळा सुरू झाला की, हा जीवघेणा खेळ सुरू होतो. लोकप्रतिनिधींपर्यंत आवाज पोहचत नाही हे मोठे दुर्भाग्य असल्याची जनभावना आहे. पावसाळा संपेपर्यंत काही नागरिक पळसनमध्ये ओळखीच्या ठिकाणी दूचाकी वाहने ठेवतात. म्हणजे नार नदी ओलांडून पळसनला यायचे, तेथून दूचाकी किंवा अन्य वाहनाने तालुक्याला यायचे. कामे उरकून पळसनला परत जावून संध्याकाळी पुन्हा नदीपात्र ओलांडून पायरपाड्याला जायचे. पावसाळा संपून जेव्हा नदीपात्र कोरडे होते, त्यावेळी उर्वरित आठ - नऊ महिने या नार नदीच्या कोरड्या पात्रातून वाहने ये - जा करतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर तिला दवाखान्यात नेता येत नाही. एखादा खूपच आजारी पडल्यावर पोहणाऱ्याला शोधून नार नदी पार करून द्या अशी विनंती करावी लागते. पुराच्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. रु ग्णांना डोली करून आणणेही कठीण झाले आहे.नार नदी पात्रातून चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जावे यावे लागते. नागरिकांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. स्वातंत्र्य काळापासून पायरपाडा गावाची अशीच परिस्थिती आहे. मोठ्या पूलाची मागणी लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली मात्र दुर्लक्ष होत आहे.- सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पळसन.

टॅग्स :floodपूरriverनदी