शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जीव धोक्यात घालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:52 IST

पायरपाडा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पळसन गावाकडे जाण्यासाठी नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे.

पळसन जवळील सातशे लोकसंख्या असलेले पायरपाडा हे गाव अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. येथील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालून पुरात नार नदी ओलांडून जावे लागत आहे. हा प्रकार दर पावसाळ्यात दिसून येतो. त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. पळसन व पायरपाडा दरम्यान कोणताही पूल नसल्याने पावसाळ्यात ही गंभीर समस्या निर्माण होते. याबाबत जूनीमागणी असूनही दूर्लक्ष झाले आहे. पावसाळा सुरू झाला की, हा जीवघेणा खेळ सुरू होतो. लोकप्रतिनिधींपर्यंत आवाज पोहचत नाही हे मोठे दुर्भाग्य असल्याची जनभावना आहे. पावसाळा संपेपर्यंत काही नागरिक पळसनमध्ये ओळखीच्या ठिकाणी दूचाकी वाहने ठेवतात. म्हणजे नार नदी ओलांडून पळसनला यायचे, तेथून दूचाकी किंवा अन्य वाहनाने तालुक्याला यायचे. कामे उरकून पळसनला परत जावून संध्याकाळी पुन्हा नदीपात्र ओलांडून पायरपाड्याला जायचे. पावसाळा संपून जेव्हा नदीपात्र कोरडे होते, त्यावेळी उर्वरित आठ - नऊ महिने या नार नदीच्या कोरड्या पात्रातून वाहने ये - जा करतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते.एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर तिला दवाखान्यात नेता येत नाही. एखादा खूपच आजारी पडल्यावर पोहणाऱ्याला शोधून नार नदी पार करून द्या अशी विनंती करावी लागते. पुराच्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. रु ग्णांना डोली करून आणणेही कठीण झाले आहे.नार नदी पात्रातून चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जावे यावे लागते. नागरिकांनाही कामानिमित्त जावे यावे लागते. स्वातंत्र्य काळापासून पायरपाडा गावाची अशीच परिस्थिती आहे. मोठ्या पूलाची मागणी लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली मात्र दुर्लक्ष होत आहे.- सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पळसन.

टॅग्स :floodपूरriverनदी