शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

साईचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ

By admin | Updated: April 6, 2016 23:11 IST

सुरेगाव रास्ता : हरिपाठासह सामूहिक आरती

 येवला : भगवंत आपल्याला कधीही विसरत नसतो, मात्र आपणच भगवंताला विसरतो. त्यामुळे भगवंताची नेहमी उपासना करा, व्यावहारिक भक्ती करू नका, असे आवाहन आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केले. सुरेगाव रास्ता येथे साईचरित्र पारायण सोहळ्याला दिमाखात सुरु वात झाली असून, या सोहळ्याअंतर्गत आयोजित प्रवचनाप्रसंगी हभप आमदार चिकटगावकर बोलत होते.प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी चिकटगावकर यांच्या हस्ते हरिपाठ व सामुदायिक सार्इंची आरती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब डमाळे, जगन्नाथ ढमाले, वाल्मीक मगर, भजन मंडळाच्या वतीने दिगंबर साबळे, कचरू चव्हाण, यांच्या हस्ते चिकटगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवचनात बोलताना ते म्हणाले, रामकृष्णहरी हा मंत्र भगवंताने मानवी जीवनाच्या उद्धारासाठी दिलेला आहे. राम म्हणजे नीतीचे प्रतीक, कृष्ण प्रीतीचे प्रतीक, तर हरी म्हणजे शांतीचे प्रतीक असल्याचे सांगत रामायण, गीता, भागवत या ग्रंथांमुळे ऊर्जा व शक्ती मिळते. रामायण हे आपणाला कसे वागायचे, तर गीताद्वारे कसे जगायचे, भागवतमुळे कशी मुक्ती मिळते याचे उदाहरणदेखील उपस्थित श्रोत्यांना पटवून दिले. भारतात धर्माला खूप महत्त्व आहे. साईबाबांकडे बघितलं तर कुठली जात व धर्म आहे हे कळत नाही. श्री साईबाबांनी सर्वधर्मसमभाव व मानवतेच्या धर्माचा आदर्श घालून दिला. हे जगातले एकमेव उदाहरण आहे. धर्मशक्ती जमविण्याकरिता संत लागतात. त्यामुळे संतांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही आमदार चिकटगावकर यावेळी म्हणाले. जोपर्यंत धर्म नाही, तोपर्यंत कर्म नाही असे सांगताना ते म्हणाले, धर्माच्या वाटेने जाल तर हित आहे. त्यामुळे संतांच्या सान्निध्यात राहा, देवावर भक्ती करा, असा सल्ला यांनी उपस्थितांना दिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येवर बोलताना ते म्हणाले शरीर अनमोल आहे. सुखाचे जसे सोबती आहेत तसे दु:खाचाही सामना करा. प्रस्ताविक बाबा डमाळे यांनी केले. गुरुवारी (दि. ७) सरला बेट मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता होईल.यावेळी हरिसंपत सोमासे, विठ्ठल चव्हाण, शरद पवार, संजय आसने, साहेबराव भागवत, कृष्णा अहेर, विमल चव्हाण, मनीषा वेताळ, कांता भोसले, ईश्वर सोमासे, विजय ढमाले, आबा सोमासे आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)