शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान कांदा बाजार सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

मालेगाव : जिल्यातील कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे सर्व बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल कुठे विकावा, ...

मालेगाव : जिल्यातील कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे सर्व बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल कुठे विकावा, असा प्रश्न पडला आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या खळ्यावर जाऊन कांदा विक्री करावी लागत असून, व्यापारी मनमानी भावाने कांदा खरेदी करीत आहेत. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला पुरेशी किंमत मिळत नाही. आगामी खरीप हंगाम पाहता बाजार समित्यांमध्ये किमान कांदा लिलाव तरी त्वरित सुरु करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मविप्रचे संचालक डॉ. जयंत पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यावर घेऊन जात विक्री करावा लागत आहे. या प्रकारामुळे शेतकरी अधिकच त्रस्त आहेत. यातून समाधानकारक भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशांची नितांत गरज आहे. यातच दोन महिन्यांपासून वेळोवेळी बेमोसमी पाऊस होत असल्याने पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे मिळेल त्या किमतीत शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विक्री करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन किमान कांदा बाजार सुरु करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. आठवड्यातून किमान चार दिवस तरी कांदा बाजार सुरु ठेवावा. बाजार समित्या सुरू झाल्यास कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या मागणीचा गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. पवार यांनी निवेदनात केली आहे.