शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आदिवासी भागात खांडणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:20 IST

पेठ -आदिवासी भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणीपुर्व मशागतीला जानेवारी महिन्यापासूनच सुरु वात होत असून त्याचा पहिला टप्पा हा खांडणीपासून सुरू होत असतो.

पेठ -आदिवासी भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणीपुर्व मशागतीला जानेवारी महिन्यापासूनच सुरु वात होत असून त्याचा पहिला टप्पा हा खांडणीपासून सुरू होत असतो. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू न देता मुळ वृक्षाला बाधा होणार नाही याची दक्षता घेऊन आदिवासी शेतकरी खांडणी करत असतात. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात भात व नागलीची पिके मोठया प्रमाणावर घेतली जातात. या पिकांची पेरणी व लावणी अशा दोन टप्प्यात केली जाते. पावसाळ्यापुर्वी भात व नागलीच्या बियाणाची शेतकरी पेरणी करतात. यासाठी शेताच्या एका कोपºयात प्रारंभी जमिनीची भाजणी केली जाते. यासाठी झाडांचा पालापाचोळा, गोवर्या, गवत, शेणखत याचा वापर केला जातो. यासाठी शेतकरी रानातील सादडयाच्या ऊंच झाडांच्या बारीक फांद्या खांडून घेतल्या जातात त्यालाच खांडणी असे म्हणतात. मुळ खोडाला कोणत्याही प्रकारची ईजा न होऊ देता बारीक फांद्या डहाळून पालापाचोळा जमा करून ठेवल्या जातात. झाडांचे मुळ खोड शाबूत राहत असल्याने पावसाळ्यात याच झाडाला नवी पालवी फुटते. त्यासाठी सद्या आदिवासी भागात सर्वत्र शेतकरी खांडणीच्या कामात गर्क झाल्याचे दिसून येतात. कमरेला कुºहाड किंवा कोयता बांधून तीव्र उताराच्या कड्यावर वाढलेल्या उंच झाडांवर शेतकरी शिताफीने चढून खांडणी करतात. यासाठी बर्याच वेळा शेतकर्यांना जीव धोक्यात घालावा लागत असतो.

टॅग्स :Nashikनाशिक