शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेस सुरळीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:22 IST

सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.

ठळक मुद्देकॉपीमुक्त वातावरणात पेपर लिहीत होते.

सिन्नर येथील एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारात तपासणी करताना शिक्षक.

 

सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.सिन्नर शहरात महात्मा फुले आणि वाजे विद्यालय अशा दोन कस्टडी असून, त्यांच्या अंतर्गत ७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. गटशिक्षण अधिकारी एस. जी. निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. वाजे विद्यालयाअंतर्गत सिन्नर महाविद्यालय व दोडी विद्यालय या दोन केंद्रांचा समावेश आहे. या दोन केंद्रांवर एकूण २०८५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर फुले विद्यालयाच्या कस्टडीअंतर्गत एस. जी. पब्लिक स्कूल, फुले विद्यालय, बारागाविपंप्री विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी आणि वडझिरे या पाच केंद्रांचा समावेश आहे. येथून ३०७१ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. शिक्षणविस्तार अधिकारी मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे या दोघांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता ही भरारी पथके परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांवर वचक बसणार असला तरी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र ठेवण्यासाठी संचालकांनाही काळजी घ्यावी घेत आहेत. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७२ सिन्नर केंद्रावर बारावीची परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात सुरळीत सुरू झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. त्यासाठी ७१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची चौकशी करून सोडले जात होते. कॉपीमुक्त वातावरणात पेपर लिहीत होते. संस्था अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरविल्या असून, केंद्र संचालक रघुनाथ एरंडे यांच्यासह शिक्षक कर्मचारी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहे.