शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

करंजगाव नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 23:21 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला आहे. खंडू बोडके-पाटील यांनी त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देसमाधान : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला आहे. खंडू बोडके-पाटील यांनी त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.पानवेली व केमिकलयुक्त रसायने सोडल्यामुळे गत आठवड्यात कोठुरे येथे मासे मृत आढळले होते. तसेच पानवेलीमुळे गोदाकाठच्या सर्वच गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यातच भर म्हणून गंगापूर धरणातून गोदावरी नदीत सोडलेल्या विसर्गामुळे करंजगाव पूल व सायखेडा पुलाला धोका निर्माण झाला होता. त्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याकडे तक्रार करत तातडीने पानवेली काढण्यास भाग पाडण्यात आले.टाळे लावा आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सायखेडा ते चेहडी या गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढण्याचे काम २९ मार्चपासून सुरू होते. मात्र बोटींच्या व अपुऱ्या मनुष्यबळाच्या साहाय्याने हे काम साडेतीन महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे तक्रार करताच पाटबंधारे विभागाने या कामाला गती दिली. सुमारे सहा ते सात किलोमीटर पसरलेल्या गोदावरी पात्रातील पानवेली काढण्यास पाटबंधारे विभागाला यश आले. मात्र सायखेडा व करंजगाव पुलावरील अजूनही एक ते दीड किमी पानवेली शिल्लक असून जेसीबीच्या साहाय्याने या पानवेली काढण्यात येत आहेत.गोदावरी नदीपात्रात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून दरवर्षी पानवेली वाहून येतात. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. पानवेली काढण्याबाबत सात्यत्याने पाठपुरावा करावा लागतो. पाटबंधारे विभागाने त्यावर कायमस्वरूपी निधीची तरतूद करून गोदाकाठच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये.- खंडू बोडके-पाटील, माजी सरपंच, करंजगाव 

टॅग्स :water transportजलवाहतूकtalukaतालुका