शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

वटार येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:40 IST

वटार : आदिवासी बांधवाचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवात सुरुवात झाल्याने या भागात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो.

ठळक मुद्देआदिवाशी बांधवासह ग्रामस्थामध्ये उत्साह

वटार : आदिवासी बांधवाचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवात सुरुवात झाल्याने या भागात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो.हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. त्यावेळेस कडक हिवाळा असतो. हा उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्यभागी उघड्यावर केला जातो. तेथे बाबू किंवा काठी उभे करून कुंपण केले जाते. यात एक प्रवेश द्वार असते. याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात. या खळीच्या मघ्यभागी मांडव टाकला जातो. या मांडवाच्या मघ्यभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जातात.चौकट.....रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदी लयबद्ध नाचतात. या उत्सवात रात्री देवदेवतांचे कथाकथन केले जाते. त्यासाठी थाळी लावण्यात येते. थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्यभागी कुरसाणीच्या झाडाची काठी लावली जाते. या काडीवर जोरात हात वरून खाली ओढल्यावर लयबद्ध असा आवाज येतो. याला ग्रामीण भागात थाळकर मनतात. हा देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्र मासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतात.या उत्सावात सहभागी झालेल्या व्यक्ती भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते. हे दिवसभर परिसरातील गावागावात जावून घरासमोर डोंगºयादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात. दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेंगदाणे देतात. दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात. हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाºयांना व सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी, बिगर तेलाची भाजी, ज्वारी किंवा नागलीची भाकरी प्रसाद म्हणून खायला देतात.या उत्सवाची सांगता मार्गशीष महिन्याच्या पैर्णिमाला होते. पोर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात. या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो. ज्या ठिकाणी गड असतो. तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात. पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते. तेव्हा या डोंगºयादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आणतात. जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात. तेव्हा पुन्हा तिसºया वर्षी हा उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहे.या नंतर गावातील सर्व लोकांकरीता महाप्रसादाचा कार्यक्र म असतो.आमच्या येथे हा ‘डोंगºयादेव उत्सव’ वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधीत घरात प्रवेश करीत नाही. शिव ओलांडत नाही. पंधरा दिवस कडक उपवास करावा लागतो. भूतलावरील वनस्पती, वन्यजीव यांचे संरक्षण संवर्धन व्हावे, मानवजातीचे कल्याण व्हावे, या गावातील वस्तीतील सर्व लोकांचे आरोग्य, सुखसंपदेची भरभराट व्हावी, व सर्व लोक सुख सस्मृध्दीने नंदावते म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते.- तात्याभाऊ सोनवणे.