शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

खोलीकरण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:43 IST

सिन्नर : भोजापूर पूरचारी निºहाळेपासून दुसंगवाडीच्या साठवण तलावापर्यंत पुरेशी रूंद नसल्याने पूर्वभागाला पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने भोजापूर पूरचारीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देभोजापूर पूरचारी : पूर्वभागाला पूरपाण्याचा मिळणार लाभ

सिन्नर : भोजापूर पूरचारी निºहाळेपासून दुसंगवाडीच्या साठवण तलावापर्यंत पुरेशी रूंद नसल्याने पूर्वभागाला पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने भोजापूर पूरचारीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.भोजापूर धरणातील पूरपाणी मिळत नसल्याने पूर्वभागातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली होती. खासदार निधी अथवा केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेतून पूरचारीचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी त्यांच्याकडे साकडे घालण्यात आले होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने सुमारे बारा लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवले होते. हा निधी राज्य वा केंद्राकडून तातडीने मिळणार नसल्याने खासदार गोडसे यांनी पोकलॅण्ड उपलब्ध करून दिले असून, इंधनखर्च जलसंपदा विभाग करणार आहे. त्यामुळे एकप्रकारे लोकसहभागातून हे काम करण्यात येत आहे.निºहाळे येथील वाघ वस्तीपासून पुढे चारीची खोली व रुंदी पुरेशी नसल्याने तेथून पुढे प्राधान्याने दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकºयांची होती. त्यानुसार या कामाचा शुभारंभ खासदार गोडसे व शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार राजभाऊ वाजे यांच्यासह आम्हीदेखील गेल्या वेळी पूरपाणी दुसंगवाडीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यात लोकांचा अपेक्षित सहभाग जाणवला नसल्याची खंत उदय सांगळे यांनी व्यक्त केली. यापुढील काम योग्यपद्धतीने करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन सांगळे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, वावीचे उपसरपंच विजय काटे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संपत पठाडे, डॉ. विजय शिंदे, कानिफनाथ घोटेकर, सतीश भुतडा, प्रशांत कर्पे, जितेंद्र घोटेकर, विठ्ठल उगले, नंदलाल मालपाणी, बाळासाहेब कहांडळ, नबाजी खरात, कचरू घोटेकर, रमेश ढमाले, सुधाकर भगत, नितीन अत्रे, दत्तात्रय आनप, विजय गुरुळे, रमेश गावडे, विष्णू सांगळे, संदीप राजेभोसले, बाळासाहेब काकड, रघुनाथ यादव, भारत यादव, विनायक घेगडमल यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी परिस्थिती सुरुवातीपासून बिकटभविष्यात सिन्नरच्या पाणीप्रश्नावर काम होणार असून, त्यामुळे दुष्काळी तालुका म्हणून असणारी ओळख कायमची पुसली जाणार असल्याचे सांगून गोडसे यांनी वैतरणा-गारगाई नदीजोड प्रकल्पाची माहिती दिली. तालुक्यातील पाण्याची स्थिती सुरुवातीपासूनच बिकट आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे नेहमीच आग्रही असतात, असेही ते म्हणाले.एकजूट व लोकसहभाग वाढवावापूर्वभागासाठी आशेचा किरण असलेल्या भोजापूरचे पूरपाणी शेवटच्या टोकाला दुसंगवाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गोडसे म्हणाले. पाण्याच्या बाबतीत कुणालाही राजकारण करणे परवडणारे नाही. मागील काळात काय झाले याकडे लक्ष न देता पूरचारीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करून घ्यावे. यासाठी एकजूट व लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन गोडसे यांनी यावेळी केले.